शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

दु:ख बाजूला सारून त्याने केले भावाचे नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:51 IST

अरुण आडिवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ऐन तारुण्यात २७व्या वर्षी लोटे (ता. खेड) येथील प्राजक्त रविकिरण देवरुखकर याचे लोटे येथील रघुवीर घाटातील धबधब्यात पडून निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ रणजीत रविकिरण देवरुखकर यांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत सामाजिक जाणीव जपत भावाचे नेत्रदान करुन एक आदर्श घडविला आहे.प्राजक्त हा दि. ...

अरुण आडिवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ऐन तारुण्यात २७व्या वर्षी लोटे (ता. खेड) येथील प्राजक्त रविकिरण देवरुखकर याचे लोटे येथील रघुवीर घाटातील धबधब्यात पडून निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ रणजीत रविकिरण देवरुखकर यांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत सामाजिक जाणीव जपत भावाचे नेत्रदान करुन एक आदर्श घडविला आहे.प्राजक्त हा दि. १३ जुलै रोजी धबधब्यावर फिरायला गेला असता तेथे त्याचा अपघात झाला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याला कोल्हापूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु त्याचा मृत्यू झाला. आपल्या लहान भावाच्या मृत्यूच्या दु:खात असूनही रणजीत देवरुखकर यांनी त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.सह्याद्री निसर्ग मित्रचे उदय पंडित, डॉ. ग. ल. जोशी, भाऊ काटदरे यांनी घरडा हॉस्पिटल, लोटे येथे जाऊन प्राजक्त देवरुखकर यांचे नेत्र (कॉर्निया) पंधरा ते वीस मिनिटात काढले. त्यानंतर खास एम. के. मिडीयम या औषधातून व विशेष बनवलेल्या अतिथंड बॉक्समधून त्वरित सांगली येथील दृष्टीदान आय बँक, डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्याकडे पाठवले. सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण डॉ. ग. ल. जोशी व इतर सर्व नेत्रतज्ज्ञांनी सुरू केलेल्या चळवळीला चालना मिळतआहे.चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्रच्यावतीने नेत्रदान चळवळ सुरू करण्यात आली आहे. वर्षभरात ११ यशस्वी नेत्रदान झाली असल्याची माहिती ‘सह्याद्री निसर्ग मित्र’चे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी दिली.जगात २० टक्के अंध भारतातजगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजे ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील ६० टक्के मोती बिंदुमुळे, तर २ टक्के कॉर्नियाच्या खराब होण्यामुळे आहे. त्यामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजाराची भर पडत असते. या १,५६,००० अंधांना जर नेत्रदानापासून कॉर्निया उपलब्ध झाला तर त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो.कॉर्निया काढला जातोनेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळ्यामधील काळ्या बुबुळाची वरची १/२ मिलिमीटर जाडीची चकती (कॉर्निया) काढून ती अंध व्यक्तीला बसवणे, नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही. हे मृत्यूनंतर ६ तासात करणे आवश्यक असते. मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते.