शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
4
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
5
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
6
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
7
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
8
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
9
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
10
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
11
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
12
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
13
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
14
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
15
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
16
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
17
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
18
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
19
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
20
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

हक्काच्या पैशासाठी करावी लागते प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

गेल्या सहा महिन्यांपासून निवृत्तिवेतनासाठी ज्येष्ठ मंडळींना प्रतीक्षा करावी लागत आहे. वयोमानानुसार विविध व्याधींनी मंडळी त्रस्त आहेत. काही मंडळींना अन्य ...

गेल्या सहा महिन्यांपासून निवृत्तिवेतनासाठी ज्येष्ठ मंडळींना प्रतीक्षा करावी लागत आहे. वयोमानानुसार विविध व्याधींनी मंडळी त्रस्त आहेत. काही मंडळींना अन्य आर्थिक स्रोत उपलब्ध नसल्याने दरमहा शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निवृत्तिवेतनावर अवलंबून राहावे लागत आहे. कोरोनामुळे वयोवृद्ध मंडळींना घराबाहेर पडणे शक्य नाही. त्यातच वेळेवर निवृत्तिवेतन होत नसल्याने काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. विविध व्याधी किंवा आजारांनी त्रस्त मंडळींना औषधोपचारासाठी जास्त खर्च करावा लागत असताना, हक्काचे निवृत्तिवेतन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने औषधोपचाराशिवाय राहावे लागत आहे. दर महिना हक्काच्या निवृत्तिवेतनासाठी पाठपुरावा करावा लागत आहे.

निवृत्तिवेतनाबरोबर शिक्षकांचे वेतनही अनियमित होत असल्याने शिक्षकांमध्येही नाराजी आहे.

कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याने जिल्हा परिषदेने स्व उत्पन्न म्हणून जमेला धरलेल्या मुख्य स्रोतांपैकी जमीन महसूल सात कोटी चार लाख, मुद्रांक शुल्कचे तीन कोटी ८६ लाख असे एकूण दहा कोटी ९० लाख अपेक्षित अनुदान प्राप्त झालेले नाहीत. विविध गुंतवणुकीवरील व्याजाची चार कोटी ४५ लाख रुपयांची रक्कम शासनाने परत मागवून घेतली. त्याचा स्व उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे नुकतेच जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर करताना घोषित करण्यात आले. असे असले तरी राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आहे. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून विक्रांत जाधव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. त्यामुळे गेलेला निधी परत आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना सहज शक्य आहे. विविध विकासकामे मार्गी लावत असताना, सेवानिवृत्तांना तरी त्यांच्या हक्काची रक्कम वेळेवर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पदाची सूत्रे हाती घेताच जिल्हा परिषदेचे ‘स्व’ उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून विविध विकासकामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना याबाबत दिलासा प्राप्त झाला असला तरी कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. अध्यक्षांनी तरी निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्ती वेतन व शिक्षकांचे वेतन वेळेवर देण्यासाठी पाठपुरावा करावा, जेणेकरून वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. कोरोनाकाळात कोविड योद्धे म्हणून विविध पातळीवर प्रशासकीय कार्यात सक्रिय राहिलेल्या शिक्षकांनाही न्याय मिळणे गरजेचे आहे. वेतनच अनियमित असेल तर विविध आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे केलेल्या कामाचा मोबदला तरी वेळेवर मिळणे आवश्यक आहे, किंबहुना तो हक्क आहे.