शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या पैशासाठी करावी लागते प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

गेल्या सहा महिन्यांपासून निवृत्तिवेतनासाठी ज्येष्ठ मंडळींना प्रतीक्षा करावी लागत आहे. वयोमानानुसार विविध व्याधींनी मंडळी त्रस्त आहेत. काही मंडळींना अन्य ...

गेल्या सहा महिन्यांपासून निवृत्तिवेतनासाठी ज्येष्ठ मंडळींना प्रतीक्षा करावी लागत आहे. वयोमानानुसार विविध व्याधींनी मंडळी त्रस्त आहेत. काही मंडळींना अन्य आर्थिक स्रोत उपलब्ध नसल्याने दरमहा शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निवृत्तिवेतनावर अवलंबून राहावे लागत आहे. कोरोनामुळे वयोवृद्ध मंडळींना घराबाहेर पडणे शक्य नाही. त्यातच वेळेवर निवृत्तिवेतन होत नसल्याने काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. विविध व्याधी किंवा आजारांनी त्रस्त मंडळींना औषधोपचारासाठी जास्त खर्च करावा लागत असताना, हक्काचे निवृत्तिवेतन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने औषधोपचाराशिवाय राहावे लागत आहे. दर महिना हक्काच्या निवृत्तिवेतनासाठी पाठपुरावा करावा लागत आहे.

निवृत्तिवेतनाबरोबर शिक्षकांचे वेतनही अनियमित होत असल्याने शिक्षकांमध्येही नाराजी आहे.

कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याने जिल्हा परिषदेने स्व उत्पन्न म्हणून जमेला धरलेल्या मुख्य स्रोतांपैकी जमीन महसूल सात कोटी चार लाख, मुद्रांक शुल्कचे तीन कोटी ८६ लाख असे एकूण दहा कोटी ९० लाख अपेक्षित अनुदान प्राप्त झालेले नाहीत. विविध गुंतवणुकीवरील व्याजाची चार कोटी ४५ लाख रुपयांची रक्कम शासनाने परत मागवून घेतली. त्याचा स्व उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे नुकतेच जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर करताना घोषित करण्यात आले. असे असले तरी राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आहे. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून विक्रांत जाधव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. त्यामुळे गेलेला निधी परत आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना सहज शक्य आहे. विविध विकासकामे मार्गी लावत असताना, सेवानिवृत्तांना तरी त्यांच्या हक्काची रक्कम वेळेवर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पदाची सूत्रे हाती घेताच जिल्हा परिषदेचे ‘स्व’ उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून विविध विकासकामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना याबाबत दिलासा प्राप्त झाला असला तरी कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. अध्यक्षांनी तरी निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्ती वेतन व शिक्षकांचे वेतन वेळेवर देण्यासाठी पाठपुरावा करावा, जेणेकरून वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. कोरोनाकाळात कोविड योद्धे म्हणून विविध पातळीवर प्रशासकीय कार्यात सक्रिय राहिलेल्या शिक्षकांनाही न्याय मिळणे गरजेचे आहे. वेतनच अनियमित असेल तर विविध आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे केलेल्या कामाचा मोबदला तरी वेळेवर मिळणे आवश्यक आहे, किंबहुना तो हक्क आहे.