शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा

By admin | Updated: September 4, 2016 00:43 IST

नंदकिशोर जकातदार : ज्योतिष अभ्यास मंडळाचा रत्नागिरीत पदवीदान समारंभ

रत्नागिरी : ज्योतिषशास्त्र हे पूर्वापार चालत आलेले राजमान्य शास्त्र आहे. त्यामुळे ज्योतिषांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजाला जागरूक करावे, असे प्रतिपादन पुण्याच्या वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी येथे केले.श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ व पुण्यातील वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकताच पदवीदान समारंभ व व्याख्यानमाला झाली, त्यावेळी ते बोलत होते. जयेश मंगल पार्क येथे हा कार्यक्रम झाला.यावेळी साई अनिरुद्ध सोसायटीच्या कार्याध्यक्षा जया सामंत म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगामुळे प्रत्येकावर ताणतणाव आहे. त्यामुळे आपली आपणच काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रत्येकाने स्वत:साठी १५-२० मिनिटे दिली पाहिजेत. त्यासाठी वेळ काढून योगासने, ध्यानधारणा करा, एकाग्र व्हा, आपली ऊर्जा आपणच तयार केली पाहिजे, आयुष्याकडे सकारत्मकतेने बघायला शिका, ज्योतिष हे महत्त्वाचे शास्त्र आहे, त्याचा करावा तेवढा अभ्यास थोडाच आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तुळजापूरच्या महाशक्तीपीठाचे डॉ. रंगनाथ नाथराव जोशी यांचेही व्याख्यान झाले. ते म्हणाले की, समाजव्यवस्था बदलण्याची ताकद ज्योतिष विषयात आहे. त्यातून सत्यम, शिवम, सुंदरम असे चित्र निर्माण होईल. यावेळी मंदरूळ (राजापूर) येथील सुनंदा विनायक नेवरे यांना कार्यगौरव पुरस्कार म्हणून प्रशस्तीपत्र व ५ हजार रुपये देण्यात आले. गतिमंद मुलांसाठी कार्यरत ‘आशादीप’ संस्थेला अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी झालेल्या व्याख्यानमालेत पुण्याच्या अ‍ॅड. मालती शर्मा यांचे वैवाहिक जीवनाची यशस्विता, सातारचे डॉ. विकास खिलारे यांचे शनिचे महत्त्व, नाशिकचे श्रीनिवास रामदास यांचे २१ व्या शतकात कर्जाचे महत्व व पुण्याचे सतीश मुंडलिक यांचे आधुनिक वास्तुशास्त्रवर व्याख्यान झाले. प्रसन्न मुळ्ये यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रेवती मेहेंदळे यांनी केले तर मधुरा चिंंचळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)