शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 12:13 IST

अवीट गोडी असणाºया हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने सवड दिल्याने शेतकरी बांधवही आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये

ठळक मुद्देकिलोवर आंबा घालता अन्य खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आंबा काढणी संपणार आहे.

रत्नागिरी : अवीट गोडी असणाºया हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने सवड दिल्याने शेतकरी बांधवही आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दर कोसळल्याने शेतकरीबांधव सध्या खासगी विक्रीबरोबर कॅनिंगसाठी आंबा घालत आहेत.

हवामानातील बदलामुळे यावर्षी एकूणच हापूसचे उत्पादन कमी राहिले आहे. अति थंडीमुळे आलेल्या पुनर्मोहोराचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच सुरूवातीपासून थ्रीप्स, तुडतुडा व बुरशीसारख्या रोगामुळे मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत होती. पहिल्या टप्प्यातील आंबा एप्रिलमध्येच संपला. दुसऱ्या टप्प्यात फारशी फलधारणा नव्हती. परिणामी उत्पन्न किरकोळ होते. तिसऱ्या टप्प्यातील आंब्यावर थ्रीप्स प्रादुर्भाव भरपूर असल्याने फळांचा आकार कमी झाला. सध्या तिसºया टप्प्यातील आंबा काढणी सुरू आहे. १०० ते ३०० रूपये डझन दराने मुंबई मार्केटमध्ये विक्री सुरू असल्याने पॅकिंग, वाहतूक, हमाली, तोलाई खर्च परवडेनासा झाल्याने शेतकऱ्यांनी खासगी किरकोळ विक्री सुरू केली आहे. मुख्य रस्त्यालगत स्टॉल लावण्यात येत असल्यामुळे पर्यटकांकडून खरेदी होत आहे. वर्गवारी करून निवडक आंबा पेट्यामध्ये भरला जातो. उर्वरित आंबा  किलोवर कॅनिंगला घातला जातो. २५ ते २६ रूपये किलो दराने आंबा खरेदी सुरू आहे. किलोवर आंबा घालता अन्य खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आंबा काढणी संपणार आहे.

हापूसबरोबर रायवळ, पायरी, केशर, आदी प्रकारचे आंबे विक्रीसाठी येत आहेत. कच्च्याबरोबर पिक्या आंब्याना प्राधान्याने मागणी होत आहे. पर्यटक वाहने थांबवून आंबा खरेदी करीत आहेत. जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे परदेशातूनही आंब्याला मागणी वाढली आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी