शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
4
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
5
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
6
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
7
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
8
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
9
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
10
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
11
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
12
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
13
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
14
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
15
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
16
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
17
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
18
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
19
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
20
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार

हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्याकडे!

By admin | Updated: May 20, 2016 22:48 IST

संजय पानसरे : गतवर्षीच्या तुलनेत आवक घटली

रत्नागिरी : आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हापूस आंबा हंगाम संपणार असला तरी कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात येथून आंब्याची आवक सुरू झाली आहे. यावर्षी वाशीच्या फळ मार्केटमध्ये एक कोटी पेट्या विक्रीला गेल्या आहेत. उत्पादन कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत आवक घटल्याचे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी यावर्षी झाल्याने हंगामापूर्वी मोहोर प्रक्रिया सुरू झाली. मोहोराची शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे जपणूक केल्यामुळेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला. यावर्षी उत्पादन लवकर आले तरी हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे. पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे फळांची गळ झाली. शिवाय उच्च तापमानामुळे फळे भाजली.आंबा पिकासाठी लागणारी खते, मोहोर, फळे संरक्षणार्थ वापरण्यात येणारी कीटकनाशके, मजुरी, पॅकिंग, इंधनखर्च, वाहतूक, हमाली, दलाली शिवाय महागाईमुळे वाढलेले दर वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम निश्चितच तूटपूंजी आहे. हवेतील गारठ्यामुळे मोहोरप्रक्रिया सातत्याने होत राहिल्याने फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. जेमतेम २५ ते ३० टक्के पीक शिल्लक राहिले. गतवर्षी दीड ते पावणेदोन कोटी पेट्या वाशी मार्केटमध्ये विक्रीला गेल्या होत्या. मात्र, यावर्षी जेमतेम एक कोटीपेट्या विक्रीस गेल्या आहेत. हापूसचा हंगाम आठवडाभरात संपणार आहे.जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, नंतर आंब्याची आवक मंदावली. परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवक वाढू लागली. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसबरोबर पायरी तसेच गुजरात, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून बदामी, केशर, लालबाग, राजापुरी, बैंगनपल्ली, तोतापुरी आंबा सुरू झाला आहे. लवकरच गुजरातमधून बलसाड, दशहरी आंब्याची आवक सुरू होणार आहे. यावर्षी वाशी मार्केटमध्ये कोकणातील हापूस कमी असला तरी कर्नाटक व दक्षिणेकडचा आंबा मुबलक प्रमाणात विक्रीला आला होता.रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यावर्षी जेमतेम एक कोटीच्या आसपास आंबा विक्रीला गेल्या. हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. ५०० रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. सुरुवातीला हापूसपेटीला पाच हजारापर्यंत दर लाभला. यावर्षी उत्पादन कमी असले तरी दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कॅनिंगला सुरुवातीला ३० रूपये दर लाभला. मात्र, पेट्यांचा दर घसल्यामुळे कॅनिंचाही दर घसरला आहे. २५ ते २८ रुपये किलो दराने खरेदी सुरू आहे. आठवडाभरात हापूसचा हंगाम संपणार आहे. शेतकरी शोधणीचा आंबा काढत आहेत. पाऊस लांबणीवर गेला, तर आंबा काढण्यात यश मिळेल. (प्रतिनिधी)बदलते हवामान : बागायतदारांची चिंताही यंदा अधिकचयंदा वारंवार बदलणाऱ्या हवामानाने हापूस आंब्याला छळले. त्यामुळे आंबा बागायतदारांची आणखीन चिंता वाढली. या हवामानाचा प्रतिकूल परिणाम हापूसवर होत आहे. त्यामुळे दरवर्षी हापूसचे पीक टप्प्याटप्प्याने घसरत आहे. २० मे नंतर हापूसचा हंगाम संपुष्टात येणार आहे. कॅनिंगला हापूस...यावर्षी हापूसच्या हंगामाची सुरुवातच उशिराने झाली आणि हंगामाचा शेवट त्यामानाने लवकर होत असल्याने यंदाचा हापूस हंगाम हा खूपच कमी राहिला आहे. सध्या हापूस आंबा कॅनिंगला पाठवणे सुरु झाले आहे.