शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्याकडे!

By admin | Updated: May 20, 2016 22:48 IST

संजय पानसरे : गतवर्षीच्या तुलनेत आवक घटली

रत्नागिरी : आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हापूस आंबा हंगाम संपणार असला तरी कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात येथून आंब्याची आवक सुरू झाली आहे. यावर्षी वाशीच्या फळ मार्केटमध्ये एक कोटी पेट्या विक्रीला गेल्या आहेत. उत्पादन कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत आवक घटल्याचे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी यावर्षी झाल्याने हंगामापूर्वी मोहोर प्रक्रिया सुरू झाली. मोहोराची शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे जपणूक केल्यामुळेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला. यावर्षी उत्पादन लवकर आले तरी हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे. पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे फळांची गळ झाली. शिवाय उच्च तापमानामुळे फळे भाजली.आंबा पिकासाठी लागणारी खते, मोहोर, फळे संरक्षणार्थ वापरण्यात येणारी कीटकनाशके, मजुरी, पॅकिंग, इंधनखर्च, वाहतूक, हमाली, दलाली शिवाय महागाईमुळे वाढलेले दर वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम निश्चितच तूटपूंजी आहे. हवेतील गारठ्यामुळे मोहोरप्रक्रिया सातत्याने होत राहिल्याने फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. जेमतेम २५ ते ३० टक्के पीक शिल्लक राहिले. गतवर्षी दीड ते पावणेदोन कोटी पेट्या वाशी मार्केटमध्ये विक्रीला गेल्या होत्या. मात्र, यावर्षी जेमतेम एक कोटीपेट्या विक्रीस गेल्या आहेत. हापूसचा हंगाम आठवडाभरात संपणार आहे.जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, नंतर आंब्याची आवक मंदावली. परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवक वाढू लागली. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसबरोबर पायरी तसेच गुजरात, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून बदामी, केशर, लालबाग, राजापुरी, बैंगनपल्ली, तोतापुरी आंबा सुरू झाला आहे. लवकरच गुजरातमधून बलसाड, दशहरी आंब्याची आवक सुरू होणार आहे. यावर्षी वाशी मार्केटमध्ये कोकणातील हापूस कमी असला तरी कर्नाटक व दक्षिणेकडचा आंबा मुबलक प्रमाणात विक्रीला आला होता.रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यावर्षी जेमतेम एक कोटीच्या आसपास आंबा विक्रीला गेल्या. हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. ५०० रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. सुरुवातीला हापूसपेटीला पाच हजारापर्यंत दर लाभला. यावर्षी उत्पादन कमी असले तरी दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कॅनिंगला सुरुवातीला ३० रूपये दर लाभला. मात्र, पेट्यांचा दर घसल्यामुळे कॅनिंचाही दर घसरला आहे. २५ ते २८ रुपये किलो दराने खरेदी सुरू आहे. आठवडाभरात हापूसचा हंगाम संपणार आहे. शेतकरी शोधणीचा आंबा काढत आहेत. पाऊस लांबणीवर गेला, तर आंबा काढण्यात यश मिळेल. (प्रतिनिधी)बदलते हवामान : बागायतदारांची चिंताही यंदा अधिकचयंदा वारंवार बदलणाऱ्या हवामानाने हापूस आंब्याला छळले. त्यामुळे आंबा बागायतदारांची आणखीन चिंता वाढली. या हवामानाचा प्रतिकूल परिणाम हापूसवर होत आहे. त्यामुळे दरवर्षी हापूसचे पीक टप्प्याटप्प्याने घसरत आहे. २० मे नंतर हापूसचा हंगाम संपुष्टात येणार आहे. कॅनिंगला हापूस...यावर्षी हापूसच्या हंगामाची सुरुवातच उशिराने झाली आणि हंगामाचा शेवट त्यामानाने लवकर होत असल्याने यंदाचा हापूस हंगाम हा खूपच कमी राहिला आहे. सध्या हापूस आंबा कॅनिंगला पाठवणे सुरु झाले आहे.