शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नारळ खत व्यवस्थापनाविषयी दूरदृश्य प्रणालीने मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST

रत्नागिरी : शहरानजिकच्या भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापनाविषयी ...

रत्नागिरी : शहरानजिकच्या भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापनाविषयी दूरदृश्य प्रणालीने (व्हिडीओ कॉन्फरन्स) कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये (रत्नागिरी)चे प्रमुख व कृषिविद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी नारळ लागवडीसाठी लागणारी जमीन, हवामान, जाती, रोपांची निवड, लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतर व मिश्र पिके, कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. वैभव शिंदे यांनी कोकणातील नारळ लागवडीची सद्यस्थिती व शेतकऱ्यांची पुढील वाटचाल कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाच्या फळांचे उत्पादन होते. याचवेळी मागणी मात्र ९८ कोटी नारळ फळाची आहे. महाराष्ट्रात साधानतः ५० टक्के उत्पादन होते, बाकीची मागणी ही इतर राज्यांकडून आयात केली जाते. यामध्ये सुधारणा करावयाची असल्यास राज्यातील नारळ क्षेत्र वाढले पाहिजे, असे आवाहन डॉ. वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसनही डॉ. वैभव शिंदे यांनी केले.

रिलायन्स फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी आभार मानताना रिलायन्स फाऊंडेशन करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली व रिलायन्स फाऊंडेशनच्या शेतकऱ्यांसाठी, पशुपालक यांच्या मार्गदर्शनासाठी असलेल्या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक १८००४१९८८०० वर संपर्क साधण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे व कार्यक्रम सहायक चिन्मय साळवी यांनी केले. या कार्यक्रमाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड येथील नारळ उत्पादक, शेतकरी व बागायतदार यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.