शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

नारळ खत व्यवस्थापनाविषयी दूरदृश्य प्रणालीने मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST

रत्नागिरी : शहरानजिकच्या भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापनाविषयी ...

रत्नागिरी : शहरानजिकच्या भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापनाविषयी दूरदृश्य प्रणालीने (व्हिडीओ कॉन्फरन्स) कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये (रत्नागिरी)चे प्रमुख व कृषिविद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी नारळ लागवडीसाठी लागणारी जमीन, हवामान, जाती, रोपांची निवड, लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतर व मिश्र पिके, कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. वैभव शिंदे यांनी कोकणातील नारळ लागवडीची सद्यस्थिती व शेतकऱ्यांची पुढील वाटचाल कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाच्या फळांचे उत्पादन होते. याचवेळी मागणी मात्र ९८ कोटी नारळ फळाची आहे. महाराष्ट्रात साधानतः ५० टक्के उत्पादन होते, बाकीची मागणी ही इतर राज्यांकडून आयात केली जाते. यामध्ये सुधारणा करावयाची असल्यास राज्यातील नारळ क्षेत्र वाढले पाहिजे, असे आवाहन डॉ. वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसनही डॉ. वैभव शिंदे यांनी केले.

रिलायन्स फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी आभार मानताना रिलायन्स फाऊंडेशन करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली व रिलायन्स फाऊंडेशनच्या शेतकऱ्यांसाठी, पशुपालक यांच्या मार्गदर्शनासाठी असलेल्या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक १८००४१९८८०० वर संपर्क साधण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे व कार्यक्रम सहायक चिन्मय साळवी यांनी केले. या कार्यक्रमाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड येथील नारळ उत्पादक, शेतकरी व बागायतदार यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.