शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

पणदेरी धरण दुरूस्तीबाबत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब सातत्याने ...

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधला व याबद्दल माहिती घेतली.

परब हे गेले दोन दिवस सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. धरण परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी परब यांनी दिल्या. धरणाचा बंधारा खचलेल्या भागाच्या मजबुतीकरणाचे काम युध्दपातळीवर करावे सोबतच धरण परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. यासाठी शासनस्तरावर कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

धरण दुरुस्तीबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन घटनास्थळी जात याबाबतचा आढावा घेण्याच्या सूचना परब यांनी दिल्या. धरण दुरुस्तीच्या उपाययोजना तत्काळ सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या घटनेमुळे घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.

धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, ३० टक्के पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. धरणाचा सांडवा दोन मीटरपर्यंत सोडलेला आहे. अजूनही काही प्रमाणात पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारच्या परिस्थितीनुसार स्थलांतरित केलेल्या ग्रामस्थांना धोका पूर्ण टळल्यानंतर त्यांच्या घरी परत पाठविण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.