शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

पदवीधर हर्षालीने राहत्या घरी पिकवली अळंबीची शेती

By admin | Updated: April 7, 2015 22:36 IST

विज्ञान युगामध्ये सर्वत्र महिला शक्तीचा प्रत्यंतर पहावयास मिळत आहे. रिक्षा चालकापासून अवकाशयानापर्यंत, कार्यालयातील स्वागतापासून कंपनीच्या एमडीपर्यंत यासारख्या

रत्नागिरी : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, आज २६ ग्रामपंचायतीतून एकूण ५९३ अर्ज तहसील कार्यालयाकडे दाखल झाले. याआधी २५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी ५० ग्रामपंचायतीतून एकूण ४९३ जागांसाठी एकूण ८४९ अर्ज दाखल झाले आहेत. खरवते ग्रामपंचायतीतून एकही अर्ज न आल्याने आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.येत्या २२ एप्रिल रोजी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीतील १७९ प्रभागांमधील एकूण ४९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ३१ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ करण्यात झाला आहे. अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्यानंतर मध्ये तीन सुट्या आल्याने उमेदवारांनी एकदम सोमवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. काल सोमवारी एकाच दिवशी २३ ग्रामपंचायतींसाठी २३८ अर्ज दाखल झाले. त्याआधी काही ग्रामपंचायतीतून १८ अर्ज आले होते. त्यामुळे सोमवारपर्यंत तालुक्यातून एकूण २५६ अर्ज दाखल झाले आहेत.आज अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने उमेदवारांची झुंबड उडाली होती. आज एकाच दिवशी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीतून २४० जागांसाठी तब्बल ५९३ अर्ज दाखल झाले. यात काल दाखल केलेल्या काही ग्रामपंचायतींसाठी आज पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे एकूण रत्नागिरी तालुक्यातील एकूण ४९३ जागांसाठी आत्तापर्यंत ८४९ अर्ज आले आहेत.रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींपैकी खरवते ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी एकही अर्ज न आल्याने आता या ग्रामपंचायतीसाठी पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)मागास प्रवर्गातील उमेदवारांना निवडणुक अर्जासोबत जात पडताळणीसाठी कागदपत्रे दाखल केल्याची पोच जोडावी लागणार असल्याने आज दिवसभर जिल्ह्यातून उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती. या आठवड्यात आलेल्या सुटीच्या तीन दिवशीही कागदपत्रे दाखल करून घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे ही कार्यालये सुरूच होती. तेव्हापासून उमेदवारांचा ओघ असला तरी कालपासून मात्र प्रचंड गर्दी झाली होती. आज सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. नरत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव, बोंड्ये आणि पूर्णगड या तीन ग्रामपंचायतीत २२ एप्रिल रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. मात्र, आत्तापर्यंत कुवारबाव ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले असून बोंड्ये, पूर्णगड या दोन ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींनाही आता पुढच्या निवडणुकीची वाट पाहवी लागणार आहे.