शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

पदवीधर हर्षालीने राहत्या घरी पिकवली अळंबीची शेती

By admin | Updated: April 7, 2015 22:36 IST

विज्ञान युगामध्ये सर्वत्र महिला शक्तीचा प्रत्यंतर पहावयास मिळत आहे. रिक्षा चालकापासून अवकाशयानापर्यंत, कार्यालयातील स्वागतापासून कंपनीच्या एमडीपर्यंत यासारख्या

रत्नागिरी : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, आज २६ ग्रामपंचायतीतून एकूण ५९३ अर्ज तहसील कार्यालयाकडे दाखल झाले. याआधी २५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी ५० ग्रामपंचायतीतून एकूण ४९३ जागांसाठी एकूण ८४९ अर्ज दाखल झाले आहेत. खरवते ग्रामपंचायतीतून एकही अर्ज न आल्याने आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.येत्या २२ एप्रिल रोजी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीतील १७९ प्रभागांमधील एकूण ४९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ३१ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ करण्यात झाला आहे. अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्यानंतर मध्ये तीन सुट्या आल्याने उमेदवारांनी एकदम सोमवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. काल सोमवारी एकाच दिवशी २३ ग्रामपंचायतींसाठी २३८ अर्ज दाखल झाले. त्याआधी काही ग्रामपंचायतीतून १८ अर्ज आले होते. त्यामुळे सोमवारपर्यंत तालुक्यातून एकूण २५६ अर्ज दाखल झाले आहेत.आज अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने उमेदवारांची झुंबड उडाली होती. आज एकाच दिवशी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीतून २४० जागांसाठी तब्बल ५९३ अर्ज दाखल झाले. यात काल दाखल केलेल्या काही ग्रामपंचायतींसाठी आज पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे एकूण रत्नागिरी तालुक्यातील एकूण ४९३ जागांसाठी आत्तापर्यंत ८४९ अर्ज आले आहेत.रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींपैकी खरवते ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी एकही अर्ज न आल्याने आता या ग्रामपंचायतीसाठी पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)मागास प्रवर्गातील उमेदवारांना निवडणुक अर्जासोबत जात पडताळणीसाठी कागदपत्रे दाखल केल्याची पोच जोडावी लागणार असल्याने आज दिवसभर जिल्ह्यातून उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती. या आठवड्यात आलेल्या सुटीच्या तीन दिवशीही कागदपत्रे दाखल करून घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे ही कार्यालये सुरूच होती. तेव्हापासून उमेदवारांचा ओघ असला तरी कालपासून मात्र प्रचंड गर्दी झाली होती. आज सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. नरत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव, बोंड्ये आणि पूर्णगड या तीन ग्रामपंचायतीत २२ एप्रिल रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. मात्र, आत्तापर्यंत कुवारबाव ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले असून बोंड्ये, पूर्णगड या दोन ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींनाही आता पुढच्या निवडणुकीची वाट पाहवी लागणार आहे.