शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

४२,८२९ निराधार व्यक्तींचे अनुदान खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाच्या निराधार निवृत्तीवेतन योजना विभागाच्या पाच विविध निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनाने एप्रिल आणि मे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाच्या निराधार निवृत्तीवेतन योजना विभागाच्या पाच विविध निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनाने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे प्रत्येकी एक असे एकूण दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगावू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लाभार्थ्यांची रक्कम पोस्टात जमाही झाली आहे. मात्र, काही भागात पाेस्टमन न गेल्याने अद्याप रक्कम या लाभार्थ्यांपर्यंत पाेहोचलेलीच नाही. त्यामुळे आगावू लाभ मिळूूनही या निराधारांचे डोळे वेतनाकडे लागून राहिले आहेत.

विशेष योजनेच्या लाभार्थ्यांना लाॅकडाऊन काळात शासनाने दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ दिले आहे. कोरोना काळात या व्यक्तींना बाहेर पडायला लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील पोस्ट कार्यालयाला या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन हातात पैसे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे पैसे गेल्या महिन्यात जमा झाले आहेत. मात्र, काही भागात अजूनही पोस्टमन गेले नसल्याने या लाभार्थ्यांना अजूनही आपल्या हक्काच्या या पैशांपासून वंचित रहावे लागले आहे.

कोरोना काळात या लोकांचे वेतन मध्यंतरी नियमित झाले होते. मात्र, आता येऊनही त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

विशेष योजनेच्या सर्व निराधारांचे निवृत्तीवेतन शासनाकडून आले असून ते तालुकास्तरावर पाठविण्यात आले. त्यानुसार ही कोषागार कार्यालयाकडून थेट त्यांच्या खात्यातही पैसे जमा झाले आहेत. लाॅकडाऊन काळात पोस्टाने त्यांच्यापर्यंत पोहोचून ही रक्कम त्यांना द्यावी, अशा सूचना जिल्हास्तरावरून तालुक्यातील पोस्ट कार्यालयांनाही दिल्या आहेत.

- राजश्री मोरे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन

आम्हाला कुणाचा आधार नाही. त्यामुळे शासन देईल, त्यावर आमची गुजराण सुरू आहे. पण अजूनही माझे पैसे मिळाले नाहीत.

- आनंदी राडे, लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना

लाॅकडाऊनच्या काळातही शासनाने दिव्यांगांचा विचार करून दोन महिन्यांसाठी दोन हजार रुपयांची मदत केली आहे. ही रक्कम मला मिळाली.

- मुश्ताक मालाणी, लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना

लाॅकडाऊनच्या काळात अडचण होणार नाही, यासाठी शासनाकडून दोन महिन्याचे प्रत्येकी एक हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली आहे.

- केशव कांबळे, लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना

शासनाकडून आलेले पैसे पोस्टातून मिळाले. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात माझ्या दोन मुलांची गुजराण होत आहे. या पैशांमुळे अडचणीच्या वेळी माझे कुटुंब सावरले आहे.

- ललिता करंबेळे, लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना

मी निराधार आहे. त्यामुळे शासनाच्या आर्थिक मदतीवर माझी गुजराण होते. लाॅकडाऊनमध्ये शासनाने मदत केली म्हणूनच वेळेवर मला पैसे मिळाले, त्याबद्दल शासनाचे आभार.

- पांडुरंग वारे, लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना

शासनाचा दिलासा पण...

शासनाने लाॅकडाऊनच्या काळात निराधार लोकांना दोन महिने प्रत्येकी हजार रुपयांची मदत केली आहे. बहुतांश जणांना ते मिळालेही. मात्र, काही वृद्ध असल्याने पोस्टमनवर विसंबून आहेत. त्यांच्यापर्यंत अद्याप पाेहोचलेले नाहीत.

या लाभार्थ्यांना थेट पैसे मिळावे, यासाठी रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशनने पाठपुरावा केला.