शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

ग्रामपंचायत पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST

पाचल : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत तालुक्यात तळवडे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला होता. या पुरस्काराचे वितरण राजापूर पंचायत समिती ...

पाचल : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत तालुक्यात तळवडे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला होता. या पुरस्काराचे वितरण राजापूर पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. आमदार राजन साळवी यांच्याहस्ते सरपंच संदीप प्रभुदेसाई, उपसरपंच चंद्रकांत गुरव व ग्रामसेवक संतोष चव्हाण यांच्याकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. ग्रामीण भागातील उत्कृष्ट घरकुल यासाठी भागिर्थी पांचाळ यांना सन्मानित करण्यात आले.

बौध्दजन मंडळाची मदत

खेड: शहरासह ग्रामीण भागातील पूरग्रस्त १५ कुटुंबीयांना बौध्दजन ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आमदार योगेश कदम यांच्याहस्ते प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुंबई-भोमडी येथील पदाधिकाऱ्यांनी ७५ हजार रुपयांचा निधी गोळा केला. त्यानंतर ही मदत देण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुशील घाडगे, शाखा अभियंता राहुल घाडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मदतकर्त्यांचा सत्कार

खेड : महापुरात कासारआळी येथील तरुणांनी जिवाची पर्वा न करता अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी आणण्यासाठी मोठी कामगिरी बजावणाऱ्या समाजातील मदतकर्त्या तरुणांचा श्री महाकाली महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. महापुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. अनेकांनी डोक्यावरील छप्पर गमावले. अशावेळी कासारआळी येथील तरुण मदतीसाठी धावून आले. त्यांनी अन्न व पाण्याचीही व्यवस्था केली.

शिष्यवृत्ती परीक्षेत यश

खेड : तालुक्यातील खवटी येथील पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित, न्यू इंग्लिश स्कूल व पी. के. दरेकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले. करण झोरे याने जिल्ह्यात पाचवा, तर प्रतीक्षा दळवी हिने ११ वा क्रमांक पटकावला. ओंकार वालणकर, हर्षा यादव हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या संस्थाध्यक्ष भालचंद्र बेलोसे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

पूरग्रस्तांना मदत

खेड : जिल्हा सहकारी ग्रुप, वापी यांच्यावतीने तालुक्यातील बोरघर-आदिवासी पाडा येथील ३५ पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तूंव्दारे मदतीचा हात दिला. साडी, सोलापुरी चादर आदींचे वाटप केले. याप्रसंगी ग्रुपचे सदस्य विनोद कदम, रामनाथ भोसले, विनोद निकम, सचिन वेल्हे, सरपंच धारा बोरकर व अन्य सदस्य उपस्थित होते.

निर्यातीसाठी कृतिदल

रत्नागिरी : कोरोना महामारीत तसेच अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. शेतमालाची निर्यात माेठ्या प्रमाणात वाढावी, यासाठी कृषी विभागामार्फत कृतिदल कार्यरत करण्यात आलेले आहे.