शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

पदवीचा बोगसपणा नडणार

By admin | Updated: June 20, 2014 00:19 IST

अलाहाबाद विद्यापीठातून प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांना बढती नाही

रहिम दलाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या करताना अलाहाबाद विद्यापीठातून पदवीधर झालेल्या शिक्षकांना वगळण्यात येणार आहे़ त्यामुळे अनेक पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक पदापासून दूर राहावे लागणार आहे़ सध्या इतर राज्यातील अनेक मुक्त विद्यापीठांच्या शाखा उघडण्यात आल्या आहेत़ त्यातून अनेकजण पदव्या प्रदान करुन शासकीय नोकऱ्यांमध्ये त्याचा वापर सर्रासपणे केला जात आहे़ आता काही दहावी, बारावी झालेले डी़एड़ धारक शिक्षकांनीही या पदव्या मिळविल्या आहेत़ अगदी कमी कालावधीत या पदव्या प्रदान केल्याने ज्यांनी महाविद्यालयांमध्ये खरोखर मेहतन घेऊन पदवी मिळविली आहे, अशांवर शासकीय फायदा घेताना अन्याय होत असल्याची ओरड सुरु आहे़ जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेतही या विषयी जोरदार चर्चा झाली होती़ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व शिक्षण समितीचे सदस्य विकास नलावडे यांनी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत अलाहाबाद विद्यापीठाच्या पदव्या बोगस असल्याचा आरोप केला होता़ त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शिक्षकांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी मिळवली आहे़ त्या पदव्या प्राप्त केलेल्या पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा नियुक्त्या देण्यात येवू नयेत, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष नलावडे यांनी केली होती़ लवकरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत़ त्यामुळे शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. या नियुक्यांच्या वेळी अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधर शिक्षकांच्याही मुख्याध्यापकपदी नियुक्त्या होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शिक्षक संघाने त्यापूर्वीच आवाज उठविला आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतलेल्या पदवीधर शिक्षकांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करताना चाप बसणार आहे़ त्यामुळे बढती मिळवण्यासाठी बोगस पदवी मिळवणाऱ्या शिक्षकांना चांगलाच चाप बसणार आहे. (शहर वार्ताहर)