शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विस्तारीकरणासाठी तटरक्षक दलाकडे जमीन हस्तांतरणाला शासनाची मान्यता

By शोभना कांबळे | Updated: June 13, 2023 20:32 IST

शासनाच्या या निर्णयामुळे रत्नागिरी विमानतळाची क्षमता वाढीस मदत होणार आहे.

शोभना कांबळे/रत्नागिरी :रत्नागिरीविमानतळाच्या विस्तारिकरणांतर्गत शहरानजिकच्या तिवंडेवाडी व मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथील १९.०१ हेक्टर आर क्षेत्राचे भारतीय तटरक्षक दल, रत्नागिरी यांच्याकडे हस्तांतरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मंगळवार, दि. १३ जून, रोजी शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे.

शासनाने रत्नागिरी विमानतळ विकासासंदर्भात जमीनीचे भूसंपादन करणे व त्यासाठी आवश्यक निधीस प्रशासकिय व वित्तीय मान्यता शासन ९ मे २०१८ रोजी दिली आहे. तसेच, रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी या विमानतळाच्या तिवंडेवाडी व मिरजोळे  येथील एकूण क्षेत्र २७.९९.५९ हेक्टर आर.चौरस मीटर संपादन करण्याच्या अनुषंगाने ४ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु.९७.४४ कोटी रूपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती.

केंद्र शासनाच्या प्रादेशिक दळणवळण योजना (Regional Connectivity Scheme) अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आलेला आहे. हे विमानतळ भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. या विमानतळाची सद्यस्थितीतील धावपट्टी १३७२ मीटर (४५०० फूट) लांबीची आहे. तथापि,या योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ Bombardier / ATR 72 प्रकारची विमाने वाहतुकीसाठी व इतर अनुषंगिक सेवा पुरविण्यास सक्षम व्हावा, यादृष्टीने या धावपट्टीची लांबी वाढवून ती २१३५ मीटर (७००० फूट) करण्याची मागणी तटरक्षक दलाने केली होती.

याखेरीज, रत्नागिरी विमानतळावरुन सुरक्षित नागरी विमान वाहतूक व्हावी, यादृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या धावपट्टीच्या पश्चिमेला मिरजोळे  विमानतळ विकासासंदर्भात जमिनीचे भूसंपादन करणे व त्यासाठी आवश्यक निधीला प्रशासकिय व वित्तीय मान्यता शासन २०१८ सालीये देण्यात आली आहे.

तसेच, रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी या विमानतळाच्या तिवंडेवाडी व मिरजोळे रत्नागिरी येथील एकूण क्षेत्र २७.९९.५९ हेक्टर आर.चौरस मीटर संपादन करण्याच्या अनुषंगाने ४ ऑक्टोबर, २०२२ रोजी ९७.४४ कोटी रूपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रत्नागिरी विमानतळाची क्षमता वाढीस मदत होणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळRatnagiriरत्नागिरी