शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांनी ठणकावले; व्यापारीही ठाम

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

पालिका-व्यापारी वाद : राजापूरचा आठवडा बाजार बंद

राजापूर : कोणतीही पूर्वकल्पना न देता नगरपरिषद प्रशासनाने राजापुरातील आठवडा बाजाराची नियमित जागा बदलल्याने संतापलेल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी त्या जागी बसण्यास नकार दिल्याने गुरवारी नेहमीप्रमाणे आठवडा बाजार भरला नव्हता. व्यापाऱ्यांनी पूर्वीच्याच ठिकाणी पुन्हा बाजार भरवला जावा, अशी मागणी रेटून धरली असतानाच दुसरीकडे नगर परिषदेनेही चांगलेच ताणून धरले आहे. आठवडा बाजाराची पूर्वीची जागा अडथळा ठरत होती म्हणून बदलली व जागा कुठली द्यायची, हा नगर परिषद कौन्सिलचा विषय आहे. बाजारातील व्यापारी ते ठरवू शकत नाहीत, असे नगराध्यक्ष मुमताज काझी यांनी ठणकावून सांगितले.अनेक वर्षांनंतर राजापुरातील आठवडा बाजाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दर गुरुवारी राजापुरात आठवडा बाजार भरतो. यापूर्वी तो कोदवली नदीपात्रात भरत होता. त्यानंतर या जागेवर महसूल प्रशासनाने अधिकार सांगितल्याने शहरातील गणेश विसर्जन घाट ते सध्याचे मच्छीमार्केट यादरम्यान तो भरु लागला.याठिकाणी दहा वर्षे हा बाजारा सुरु आहे. अलिकडे राजापूर पालिका प्रशासनाने कोणतीच पूर्वकल्पना न देता बाजाराच्या ठिकाणात बदल करुन अर्जुना नदीच्या पात्रालगत जेथे डंपिंग करुन गाळ ठेवण्यात आला आहे, त्या ठिकाणी भरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे व्यापाऱ्यांचे पित्त चांगलेच खवळले आहे. नगर परिषदेने दिलेली जागा ही पुरेशी नाही व धोकादायक आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे राजापुरात दाखल झालेल्या व्यापाऱ्यांना पूर्वीच्या जागी बसण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे संतापलेल्या काही व्यापारी व प्रशासनात शाब्दीक चकमक उडाली. व्यापारी व प्रशासन हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. बाजाराचे ठिकाण ठरविण्याचा अधिकार हा आमचा असून, तो आठवडा बाजारातील व्यापारी ठरवू शकत नाहीत, असे पालिकेने ठणकावून सांगितले आहे.त्यानंतर कडधान्य व्यापाऱ्यांनी बाजारात बसण्यास नकार दिला. त्यांना मच्छी व्यावसायिकांनी साथ दिली. नंतर काही व्यापारी बाजारातून निघून गेले. त्यामुळे भरलेल्या आठवडा बाजारात काही व्यापारीच उपस्थित होते.जागेत झालेल्या बदलामुळे हे व्यापारी आपली कैफीयत जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याबाबत राजापूरच्या नगराध्यक्ष मुमताज काझी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आठवडा बाजाराची जागा बदलण्याचा निर्णय पालिकेचा आहे. राजापुरात मुबलक जागा उपलब्ध नाही. त्यामुळे रहदारीच्या मार्गावरच आठवडा बाजार भरत असे. त्याचा फटका वाहतुकीसह स्थानिक व्यापाऱ्यांना होत होता. परगावाहून येणारी मालवाहतूक गुरुवारी आठवडा बाजार व शुक्रवारी राजापूर शहर बंद असल्याने रखडून राहात होती. या अडचणीमुळे आठवडा बाजाराच्या जागेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काझी यांनी दिली.आठवडा बाजारात नाशवंत मालाचीच विक्री केली जाते. अलिकडच्या काळात या बाजारात सर्वच प्रकारच्या मालाची विक्री होत असून, बाजारातील व्यापारी जर नियमाप्रमाणे जाणार असतील तर आम्हीही कायद्यावरच बोट ठेवून जाऊ, असा इशारा नगराध्यक्ष काझी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे राजापूरच्या आठवडा बाजाराचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)४नगरपरिषद प्रशासनाने राजापुरातील आठवडा बाजाराची नियमित जागा बदलल्याने व्यापारी संतप्त.४आठवडा बाजाराची जागा ठरवण्याचा अधिकार व्यापाऱ्यांचा नाही, पालिकेचा : नगराध्यक्षा.४....तर आम्हीही कायद्यावर बोट ठेवू : नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी दिला इशारा.४जुन्या ठिकाणांमुळे शहरातील मालवाहतूक रखडत असल्याचे राजापूर नगर पालिकेचे म्हणणे.