शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

सरपंच, उपसरपंचांना सरकार मानासोबत धनही देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:28 IST

Sarpanch Ratnagiri- सरपंच, उपसरपंच निवड इतर निवडून आलेल्या सदस्यांमधून होत असली तरी शासनाचे मानधन केवळ सरपंच आणि उपसरपंच यांना मिळते. सदस्यांना मासिक बैठकीचा भत्ता दिला जातो.

ठळक मुद्देसरपंच, उपसरपंचांना सरकार मानासोबत धनही देणारसदस्यांना बैठक भत्त्यासह केवळ चहापानावर समाधान

शोभना कांबळेरत्नागिरी : सरपंच, उपसरपंच निवड इतर निवडून आलेल्या सदस्यांमधून होत असली तरी शासनाचे मानधन केवळ सरपंच आणि उपसरपंच यांना मिळते. सदस्यांना मासिक बैठकीचा भत्ता दिला जातो.ग्रामपंचायतीचा डोलारा सरपंचाला सांभाळावा लागतो. गावाच्या कामांसाठी सरपंचाला ग्रामपंचायतीत दर दिवशी उपस्थित राहावे लागते. त्यामुळे शासनाकडून २००० पर्यंतची लोकसंख्या असेल त्या ठिकाणी सरपंच - उपसरपंच यांना अनुक्रमे ३०००, १००० तसेच ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ४००० आणि १५००, तर ८००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच यांना अनुक्रमे ५००० आणि २००० रुपये इतके मानधन आहे. सरपंच - उपसरपंच निवडून देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मासिक बैठकीचा भत्ता केवळ २०० रुपये आणि चहापानावर समाधान मानावे लागणार आहे.सरपंच म्हणजे गावचा अनभिषिक्त राजा. शासनाच्या आलेल्या निधीचा विनीयोग, ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या दाखल्यांवर सह्या करणे, गावचा कारभार सांभाळणे ही मुख्य कामे सरपंचाची असल्याने त्याने ग्रामपंचायतीत दरदिवशी उपस्थित रहाणे अपेक्षित असते. त्याच्या गैरहजेरीत उपसरपंच कारभार पाहातो. त्यामुळे शासनाकडून या दोघांना मानधन मिळते. मात्र, सदस्य मासिक सभेलाच उपस्थित राहात असल्याने त्यांना शासनाकडून बैठकीचा भत्ता दिला जातो. 

 

गावाच्या कामांसाठी सरपंचाला दरदिवशी ग्रामपंचायतीशी संपर्क ठेवणे आवश्यक असते. ही कामे त्याला ग्रामसेवकासोबत राहून करावी लागतात. सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंच ग्रामपंचायतीचा कारभार पाहतो. त्यामुळे शासनाकडून या दोघांना मानधन दिले जाते. सदस्यांचाही विचार करणे आवश्यक आहे.- बापू शेट्ये,सरपंच कोंडगाव, साखरपा, ता. संगमेश्वर

ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच यांना रोजगाराचे कुठलेच साधन नसते. तसेच या दोघांना ग्रामपंचायतीत नियमित उपस्थित राहावे लागते. मात्र, सदस्यांना केवळ महिन्याच्या बैठकीसाठी ग्रामपंचायतीत यावे लागते. त्यामुळे त्यांना केवळ महिन्याच्या बैठकीचा भत्ता दिला जातो. परंतु सदस्यांच्या भत्त्यातही वाढ व्हायला हवी.- प्रशांत पाटील,नूतन सरपंच, कोळंबे

ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच आणि त्याचे इतर सदस्य यांच्यावर अवलंबून असतो. सध्या सरपंच आणि उपसरपंच यांना मानधन दिले जात आहे. मात्र, इतर सदस्यांना केवळ महिन्यातून एका बैठकीचा भत्ता दिला जातो. हा भत्ता शासनाने वाढवून द्यायला हवा. कारण हे सदस्य कुठल्या कामासाठी जाताना काही वेळा आपला खर्च करतात.- संजय पाटोळे,सरपंच, तळवडे

टॅग्स :sarpanchसरपंचRatnagiriरत्नागिरी