शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

वैद्यकीय पदे भरण्यासंदर्भात शासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:33 IST

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती संदर्भात खलील वस्ता यांनी ॲड. राकेश भाटकर यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य शासनातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून, याचिकाकर्त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत योग्य ते आदेश देण्याची विनंती संचालक, आरोग्य सेवा आयुक्त यांच्यातर्फे करण्यात आली.

ठळक मुद्देवैद्यकीय पदे भरण्यासंदर्भात शासन हतबलमुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

रत्नागिरी : महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती संदर्भात खलील वस्ता यांनी ॲड. राकेश भाटकर यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य शासनातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून, याचिकाकर्त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत योग्य ते आदेश देण्याची विनंती संचालक, आरोग्य सेवा आयुक्त यांच्यातर्फे करण्यात आली.प्रतिज्ञापत्रामध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात काही पदे निर्माण केली असून, त्याची जाहिरात दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली व त्यामध्ये ५९ अर्जदारांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. परंतु, फक्त ३२ उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली. त्यामध्ये १५ एमबीबीएस डॉक्टर आहेत. परंतु, त्यातही २७ उमेदवारांनी राजीनामे दिले त्यामुळे सध्या स्थिती चार एमबीबीएस आणि २२ स्पेशालिस्ट डॉक्टर रत्नागिरीमध्ये उपलब्ध आहे.जिल्हाधिकारी यांनी कोरोनासाठी वैद्यकीय पदे भरण्याचा निर्णय घेतला आणि जुलै महिन्यामध्ये दिलेल्या जाहिरातीत १०८ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. त्यातील ७१ उमेदवार हजर झाल्यानंतर ३७ उमेदवारांनी राजीनामे दिलेले आहे.त्यामुळे रत्नागिरीमध्ये वैद्यकीय पद रिक्त असल्याबाबत दुजोरा दिला. परंतु, पात्र उमेदवार हे सरकारी रुग्णालयात काम करण्यास इच्छुक नसल्याने पदे भरली जात नाहीत. तसेच वर्ग दोन तीन व चार कर्मचारी यांच्या भरती संदर्भात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.प्रतिज्ञापत्रामध्ये आरोग्य विभागातर्फे न्यायालयाला असे आश्वासित करण्यात आले की, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश देण्यात येतील आणि यामुळे याचिकेवर न्यायालयाने योग्य ते आदेश पारित करावे, असेही म्हटले आहे. या प्रतिज्ञापत्राद्वारे शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती बाबत असलेली हतबलता न्यायालयासमोर मांडली आहे.या जनहित याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यात याचिकाकर्ता खलील वस्ता यांचे वतीने अ‍ॅड. राकेश भाटकर काम पाहत आहेत. शासन कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरतीची जाहिरात देत असल्याने पात्र उमेदवार येत नाहीत त्यामुळे प्रथम स्थायी रिक्तपदे का भरत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयRatnagiriरत्नागिरी