शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय पदे भरण्यासंदर्भात शासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:33 IST

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती संदर्भात खलील वस्ता यांनी ॲड. राकेश भाटकर यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य शासनातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून, याचिकाकर्त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत योग्य ते आदेश देण्याची विनंती संचालक, आरोग्य सेवा आयुक्त यांच्यातर्फे करण्यात आली.

ठळक मुद्देवैद्यकीय पदे भरण्यासंदर्भात शासन हतबलमुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

रत्नागिरी : महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती संदर्भात खलील वस्ता यांनी ॲड. राकेश भाटकर यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य शासनातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून, याचिकाकर्त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत योग्य ते आदेश देण्याची विनंती संचालक, आरोग्य सेवा आयुक्त यांच्यातर्फे करण्यात आली.प्रतिज्ञापत्रामध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात काही पदे निर्माण केली असून, त्याची जाहिरात दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली व त्यामध्ये ५९ अर्जदारांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. परंतु, फक्त ३२ उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली. त्यामध्ये १५ एमबीबीएस डॉक्टर आहेत. परंतु, त्यातही २७ उमेदवारांनी राजीनामे दिले त्यामुळे सध्या स्थिती चार एमबीबीएस आणि २२ स्पेशालिस्ट डॉक्टर रत्नागिरीमध्ये उपलब्ध आहे.जिल्हाधिकारी यांनी कोरोनासाठी वैद्यकीय पदे भरण्याचा निर्णय घेतला आणि जुलै महिन्यामध्ये दिलेल्या जाहिरातीत १०८ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. त्यातील ७१ उमेदवार हजर झाल्यानंतर ३७ उमेदवारांनी राजीनामे दिलेले आहे.त्यामुळे रत्नागिरीमध्ये वैद्यकीय पद रिक्त असल्याबाबत दुजोरा दिला. परंतु, पात्र उमेदवार हे सरकारी रुग्णालयात काम करण्यास इच्छुक नसल्याने पदे भरली जात नाहीत. तसेच वर्ग दोन तीन व चार कर्मचारी यांच्या भरती संदर्भात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.प्रतिज्ञापत्रामध्ये आरोग्य विभागातर्फे न्यायालयाला असे आश्वासित करण्यात आले की, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश देण्यात येतील आणि यामुळे याचिकेवर न्यायालयाने योग्य ते आदेश पारित करावे, असेही म्हटले आहे. या प्रतिज्ञापत्राद्वारे शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती बाबत असलेली हतबलता न्यायालयासमोर मांडली आहे.या जनहित याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यात याचिकाकर्ता खलील वस्ता यांचे वतीने अ‍ॅड. राकेश भाटकर काम पाहत आहेत. शासन कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरतीची जाहिरात देत असल्याने पात्र उमेदवार येत नाहीत त्यामुळे प्रथम स्थायी रिक्तपदे का भरत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयRatnagiriरत्नागिरी