शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इंजिनिअरिंग काॅलेज पुढच्या वर्षापासून सुरू होणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ...

रत्नागिरी : रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, त्यासाठी ए. एस. आय. पी.ची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापासून ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार असून, यात मेकाट्रोनिक्स या नव्या अभ्यासक्रमाचा पहिल्यांदाच समावेश आहे. या प्रत्येक अभ्यासक्रमाची क्षमता ६० असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत नूतन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोविडचे प्रमाण कमी होत आहे, नवीन जिल्हाधिकारी यांनी एक महिन्यात दुसरी लाट संपविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. तौक्ते वादळातील बाधितांसाठी २१ कोटी २५ लाख ६० हजार प्राप्त झाले असून, त्यापैकी ७ कोटी ६० लाख रुपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. यापैकी घरांसाठी ३ कोटी १ लाख, तसेच ५ कोटी ६० लाख, दोन मृतांच्या वारसांसाठी ८ लाख, मत्स्य विभागासाठी ११ लाख आदींचे वाटप झाले आहे.

दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे. कोरोनामुळे परीक्षा झाल्या नसल्या तरी मार्क्सचे स्ट्रक्चर योग्य आहे. कोकणच्या विद्धवतेची शान कोकणातील मुलांनी दाखवून दिल्याचे सांगत सामंत यांनी या मुलांचे कौतुक केले. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यातील काही परिचारिका पगार न मिळाल्याने काम सोडून गेल्या आहेत. याबाबत, सामंत यांनी यापैकी ६२ परिचारिकांचे पगार ताबडतोब द्यायला सांगितले असल्याची माहिती दिली.

- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील १५ हजार तरुण, तरुणींचे लसीकरण करणार.

- चिपळूण येथील रिकामा ऑक्सिजन सिलिंडरप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना नोटीस देण्याऐवजी कारवाई करण्यास सांगितले.

- आरोग्य क्षेत्रातील भरती कोरोनामुळे थांबली आहे. आता ती चक्राकार पद्धतीने सुरू होणार असून, त्याची सुरूवात रत्नागिरी - सिंधुदुर्गातून सुरू आहे.

- मुंबई - गोवा महामार्गासाठी केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलनात उतरणार.