शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शासकीय इंजिनिअरिंग काॅलेज पुढच्या वर्षापासून सुरू होणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ...

रत्नागिरी : रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, त्यासाठी ए. एस. आय. पी.ची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापासून ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार असून, यात मेकाट्रोनिक्स या नव्या अभ्यासक्रमाचा पहिल्यांदाच समावेश आहे. या प्रत्येक अभ्यासक्रमाची क्षमता ६० असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत नूतन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोविडचे प्रमाण कमी होत आहे, नवीन जिल्हाधिकारी यांनी एक महिन्यात दुसरी लाट संपविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. तौक्ते वादळातील बाधितांसाठी २१ कोटी २५ लाख ६० हजार प्राप्त झाले असून, त्यापैकी ७ कोटी ६० लाख रुपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. यापैकी घरांसाठी ३ कोटी १ लाख, तसेच ५ कोटी ६० लाख, दोन मृतांच्या वारसांसाठी ८ लाख, मत्स्य विभागासाठी ११ लाख आदींचे वाटप झाले आहे.

दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे. कोरोनामुळे परीक्षा झाल्या नसल्या तरी मार्क्सचे स्ट्रक्चर योग्य आहे. कोकणच्या विद्धवतेची शान कोकणातील मुलांनी दाखवून दिल्याचे सांगत सामंत यांनी या मुलांचे कौतुक केले. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यातील काही परिचारिका पगार न मिळाल्याने काम सोडून गेल्या आहेत. याबाबत, सामंत यांनी यापैकी ६२ परिचारिकांचे पगार ताबडतोब द्यायला सांगितले असल्याची माहिती दिली.

- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील १५ हजार तरुण, तरुणींचे लसीकरण करणार.

- चिपळूण येथील रिकामा ऑक्सिजन सिलिंडरप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना नोटीस देण्याऐवजी कारवाई करण्यास सांगितले.

- आरोग्य क्षेत्रातील भरती कोरोनामुळे थांबली आहे. आता ती चक्राकार पद्धतीने सुरू होणार असून, त्याची सुरूवात रत्नागिरी - सिंधुदुर्गातून सुरू आहे.

- मुंबई - गोवा महामार्गासाठी केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलनात उतरणार.