शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

सरकारची काटकसर, पाेषण आहारात तेलाएवजी साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाकडून सहा महिने ते तीन वर्षे, गरोदर माता, स्तनदा माता यांना धान्य, डाळी, कडधान्य ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाकडून सहा महिने ते तीन वर्षे, गरोदर माता, स्तनदा माता यांना धान्य, डाळी, कडधान्य तेल, मीठ, तिखट स्वरूपात पोषण आहार दर दोन महिन्यांनी देण्यात येतो. कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे या मुलांना ताजा पोषण आहार उपलब्ध होत नसल्याने धान्य स्वरूपात पोषण आहार वितरित केला जात आहे. जानेवारीमध्ये शासनाच्या अध्यादेशानुसार पाककृतीमध्ये बदल करण्यात आला असून, तेलाऐवजी साखर वितरित करण्यात येत आहे. शिवाय गहू व डाळींच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कंझ्युमर फेडरेशन, मुंबईकडे धान्य वितरणाचा ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार सुट्टीचे दिवस वगळून ५० दिवसांसाठी लाभार्थ्यांसाठी पोषण आहार अंगणवाडीकडे वितरित केला जातो. त्यानुसार अंगणवाडीच्या कर्मचारी यादीनुसार लाभार्थ्यांशी संपर्क साधून पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना तेलाऐवजी एक किलो साखर दिली जात असून गहू १६ ग्रॅम व मसूरडाळ आठ ग्रॅमने प्रमाण वाढविण्यात आले आहे. तेलाचे दर भडकलेले असतानाच तेलाऐवजी साखर दिली जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्याच्या पोषण आहारापासून तेलाऐवजी साखर वितरित केली जात आहे.

अंगणवाडीतील बालकांना (तीन ते सहा वर्षे वयोगटातील) तसेच पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही शालेय पोषण आहार शिजवून दिला जात होता. मात्र कोरोनामुळे शाळा, अंगणवाड्या बंद असल्यामुळे पालकांना प्रत्येक लाभार्थ्यांना शासनाच्या निकषांनुसार डाळी, कडधान्ये, गहू, तांदूळ योग्य प्रमाणात वितरित केले जात आहेत.

काय - काय मिळते...

स्तनदा, गरोदर मातांना गहू, मसूरडाळ, हळद, तिखट, मीठ, साखर, चणे देण्यात येत आहेत. प्रत्येक लाभार्थ्यासाठी प्रमाण निश्चित केलेले आहे.

सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी गहू, चणे/चवळी/मटकी/मूग, मसूरडाळ, तिखट, मीठ, तेल दिले जात आहे.

तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना गरम ताज्या पोषण आहारात वरण-भात, खिचडी शिजवून देण्यात येत होती. त्यामुळे तांदूळ, चणे/मूग/मटकी/चवळी, गहू, मसूरडाळ, तिखट, मीठ, तेल देण्यात येते.

शासन अध्यादेशानुसार बदल

दि. २२ जानेवारी रोजी आयुक्तांच्या आदेशानुसार पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. पाककृतीमध्ये बदल झाला असून, तेलाऐवजी साखर दिली जात आहे. गहू व मसूरडाळीच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसारच पोषण आहाराचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना पोषण आहार दर दोन महिन्यानी वितरित करण्यात येत आहे.

- योगेश जवादे,

जिल्हा कार्यक्रमाधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

शासनाकडून पोषण आहार देण्यात येत असून, त्यामध्ये आता तेलाऐवजी साखर देण्यात येत आहे. वास्तविक साखर रद्द करून तेल दिले तर योग्य राहील. तेलाचे दर भडकलेले असताना पोषण आहार पाण्यात शिजविला तरी फोडणी कशाची द्यावी हा प्रश्न आहे.

- ऋतुजा चाळके, लाभार्थी

दोन महिन्यांतून एकदा पोषण आहारातील डाळी, कडधान्य, धान्यांचे वितरण केले जाते. बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच तेल देण्याऐवजी साखर दिली जात आहे. वास्तविक तेलाला साखर हा पर्याय अयोग्य आहे. याबाबत शासनाने विचार करणे आवश्यक आहे.

- गायत्री पाटील, लाभार्थी

अंगणवाडी गेले दीड वर्ष बंद असल्यामुळे पोषण आहारासाठी धान्य देण्यात येते. तेल न देता साखर देण्यात येत असली तरी वरणाला साखरेची फोडणी देता येत नाही. तेलाचे दर आधीच कडाडलेले आहेत. त्यामुळे पोषण आहाराला पाण्याची फोडणी द्यावी का?

- दीपाली रामाणी, पालक