शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णकन्या चमकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 10:56 IST

नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताला विजय मिळवून देण्यात दोघींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ठळक मुद्देऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतारची सुवर्ण कामगिरीभारताच्या विजयात रत्नकन्यांचा सहभाग

रत्नागिरी : नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताला विजय मिळवून देण्यात दोघींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऐश्वर्याची दुसरी, तर अपेक्षाची पहिलीच स्पर्धा होती. आठपेक्षा अधिक देश सहभागी झाले होते. अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऐश्वर्या सावंत हिने तीन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले, तर प्रियंका भोपीने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले. कृष्णा यादवने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. आक्रमणात कर्णधार नसरीन व काजल भोरने प्रत्येकी पाच खेळाडूंना बाद करून विजय सोपा केला. दुसऱ्या डावात सस्मिता शर्माने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. मुकेशने तीन मिनिटे, तर कलाईवीनने दोन मिनिटे संरक्षण केले व विजय साजरा केला.नेपाळच्या पुनम थारूने एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले व अंजली थाने एक मिनिट संरक्षण करून जोरदार लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत अपेक्षा सुतार व ऐश्वर्या सावंत यांनी उत्कृष्ट खेळ करून भारताला विजय संपादन करून दिला. शिवाय दोघींनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ऐश्वर्या, अपेक्षा यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर यश संपादन करून रत्नागिरीचा झेंडा उंचावला असून, दोघींचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी