शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णकन्या चमकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 10:56 IST

नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताला विजय मिळवून देण्यात दोघींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ठळक मुद्देऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतारची सुवर्ण कामगिरीभारताच्या विजयात रत्नकन्यांचा सहभाग

रत्नागिरी : नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताला विजय मिळवून देण्यात दोघींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऐश्वर्याची दुसरी, तर अपेक्षाची पहिलीच स्पर्धा होती. आठपेक्षा अधिक देश सहभागी झाले होते. अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऐश्वर्या सावंत हिने तीन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले, तर प्रियंका भोपीने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले. कृष्णा यादवने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. आक्रमणात कर्णधार नसरीन व काजल भोरने प्रत्येकी पाच खेळाडूंना बाद करून विजय सोपा केला. दुसऱ्या डावात सस्मिता शर्माने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. मुकेशने तीन मिनिटे, तर कलाईवीनने दोन मिनिटे संरक्षण केले व विजय साजरा केला.नेपाळच्या पुनम थारूने एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले व अंजली थाने एक मिनिट संरक्षण करून जोरदार लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत अपेक्षा सुतार व ऐश्वर्या सावंत यांनी उत्कृष्ट खेळ करून भारताला विजय संपादन करून दिला. शिवाय दोघींनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ऐश्वर्या, अपेक्षा यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर यश संपादन करून रत्नागिरीचा झेंडा उंचावला असून, दोघींचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी