शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णकन्या चमकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 10:56 IST

नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताला विजय मिळवून देण्यात दोघींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ठळक मुद्देऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतारची सुवर्ण कामगिरीभारताच्या विजयात रत्नकन्यांचा सहभाग

रत्नागिरी : नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताला विजय मिळवून देण्यात दोघींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऐश्वर्याची दुसरी, तर अपेक्षाची पहिलीच स्पर्धा होती. आठपेक्षा अधिक देश सहभागी झाले होते. अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऐश्वर्या सावंत हिने तीन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले, तर प्रियंका भोपीने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले. कृष्णा यादवने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. आक्रमणात कर्णधार नसरीन व काजल भोरने प्रत्येकी पाच खेळाडूंना बाद करून विजय सोपा केला. दुसऱ्या डावात सस्मिता शर्माने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. मुकेशने तीन मिनिटे, तर कलाईवीनने दोन मिनिटे संरक्षण केले व विजय साजरा केला.नेपाळच्या पुनम थारूने एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले व अंजली थाने एक मिनिट संरक्षण करून जोरदार लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत अपेक्षा सुतार व ऐश्वर्या सावंत यांनी उत्कृष्ट खेळ करून भारताला विजय संपादन करून दिला. शिवाय दोघींनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ऐश्वर्या, अपेक्षा यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर यश संपादन करून रत्नागिरीचा झेंडा उंचावला असून, दोघींचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी