शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

नातेवाइकांना साेडायला स्थानकावर जाणे अद्याप ‘महाग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे दीड वर्षापासून रेल्वेस्थानकावर प्रवाशांव्यतिरिक्त नातेवाइकांना बंदी करण्यात आली आहे. शिवाय गेले ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे दीड वर्षापासून रेल्वेस्थानकावर प्रवाशांव्यतिरिक्त नातेवाइकांना बंदी करण्यात आली आहे. शिवाय गेले वर्षभर रेल्वेस्थानक तिकीट दर वाढविण्यात आले आहेत. अन्य जिल्ह्यातील प्लॅटफाॅर्म तिकीट दर तीस रुपयांवरून दहा रुपये करण्यात आले असताना रत्नागिरी स्थानकावरील दर मात्र ‘जैसे-थे’ आहेत.

कोरोनामुळे रेल्वे सुरुवातीला बंद होत्या. मात्र, अनलाॅकनंतर मोजक्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. परंतु, आरक्षण असेल तर प्रवासी प्रवास करू शकतात, अन्यथा प्रवेश रद्द करण्यात आला असल्याने प्रवाशांना सोडायला येणारे नातेवाईक स्थानकाबाहेरच थांबत आहेत. प्लॅटफाॅर्म तिकीट दरही कमी केलेले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांना सोडायला जाणे अद्याप तरी परवडणारे नाही.

राेज १५० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री

कोरोनापूर्वी दिवसाला शंभर ते दीडशे प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सहज होत असल्याने चांगला महसूल प्राप्त होत होता.

गतवर्षी प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या मागणीवरून ते ३० रुपये करण्यात आले.

मात्र, सध्या प्लॅटफाॅर्म प्रवेशच बंद असल्यामुळे रेल्वे प्रशासनाला दररोज मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

प्लॅटफाॅर्मची गर्दी कमी

गणेशोत्सवापूर्वी मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र, दिवसाला सध्या ५० फेऱ्या धावत आहेत. दिवा-सावंतवाडी व दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्या आरक्षित आहेत. सर्व स्थानकांतून दोन्ही गाड्या थांबत असल्या तरी आरक्षण असेल तरच प्रवाशांना प्रवासाची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विना आरक्षण प्रवास करणाऱ्यांना चाप बसला आहे. सध्या तरी आरक्षण असलेले प्रवासी आरामात प्रवास करीत आहेत. आरक्षण तपासणी काटेकोरपणे केली जात असल्याने प्लॅटफाॅर्मवर भटकंतीसाठी येणाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे. अन्य जिल्ह्यांप्रमाणे प्लॅटफार्म तिकीट दर दहा रुपयांवर आणणे गरजेचे आहे. शिवाय प्लॅटफाॅर्म प्रवेश नातेवाइकांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे.

परदेशी किंवा विशेष यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी नातेवाईक मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात येत असतात. त्यामुळे रेल्वे येईपर्यंत नातेवाईक थांबतात. साहजिकच प्लॅटफाॅर्म तिकीट काढावेच लागते. सुरुवातीला दहा रुपये असलेला दर अचानक ५० रुपये करण्यात आला. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार तिकीट दर ३० रुपयांवर आणण्यात आले. आतापर्यंत ३० रुपये दर स्थिर आहे. अन्य जिल्ह्यांतील प्लॅटफाॅर्म तिकीट दर कमी करण्यात आले असताना रत्नागिरीतील दर मात्र अद्याप कमी केलेले नाहीत. परंतु, आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफाॅर्मवर प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे विना तिकीट किंवा प्लॅटफाॅर्म तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम बसला आहे.

सुरू असलेल्या रेल्वे

n कोकणकन्या एक्स्प्रेस

n मांडवी एक्स्प्रेस

n नेत्रावती एक्स्प्रेस

n मत्स्यगंधा एक्स्प्रेस

n जनशताब्दी एक्स्प्रेस

n तुतारी एक्स्प्रेस