शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरून जाताय... खड्ड्यात जाल

By admin | Updated: February 2, 2015 23:58 IST

रस्त्यावरील फरशी पुलांचे बांधकाम करण्यासही खोदले खड्डे

पाटण : कोकणशी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कऱ्हाड-चिपळूण हा राज्यमार्ग आहे. या राज्यमार्गाची कऱ्हाड ते पोफळी दरम्यान अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यातच पाटण तालुक्याच्या हद्दीत असणारे रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फरशी पुलांचे काम बांधकाम विभागाने सुरू केले असून, त्यासाठी जागोजागी खोल खड्डे काढले आहेत. ‘येथे खोल खड्डा आहे,’ असे फलक त्याठिकाणी लावले असले तरी सर्वच फरशी पूल एकदम बांधायचे काम हाती घेतल्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या वाहनांना धोकादायक झाले आहे. कऱ्हाड-चिपळूण हा राज्य मार्ग चौपदरीकरण होणार अशी चिन्हे दिसू लागली असून, त्याची सुरुवात कऱ्हाड तालुक्यातील विजयनगर ते वारुंजी विमानतळ परिसरात दिसून येते. अगोदरच या रस्त्याच्या दुतर्फा जुनी झाडे असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यातच पाटण ते कोयनानगर दरम्यानचा रस्ता खड्ड्यात गेल्याने वाहतुकीस अयोग्य झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील सर्व फरशी पुलांचे नवीन बांधकाम सुरू केल्यामुळे जेसीबीच्या साह्याने मोठमोठ्या चरी काढून खोल खड्डे काढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी भरधाव येणारी वाहने अशा धोकादायक खड्ड्यांचा बळी ठरण्याची शक्यता आहे. एकाच वेळी सर्व फरशी पुलांची कामे हाती घेण्याची गरज नव्हती ,अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)काम ठप्प...!कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावर फरशी पूल बांधण्यासाठी खड्डे काढून ठेवले आहेत. त्यावर बांधकाम करणारी यंत्रणा अत्यंत धिम्यागतीने काम करत आहे. काही ठिकाणी तर खड्डे काढून ठेवले आहेत, मात्र काम सुरू नाही.