शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

भाजप-राष्ट्रवादीची रत्नागिरी पालिकेत गट्टी!

By admin | Updated: November 7, 2014 09:49 IST

रत्नागिरी नगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलणार असून, सेना-भाजप युती संपुष्टात येऊन भाजपा - राष्ट्रवादी असे नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलणार असून, सेना-भाजप युती संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि. ११) होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची बोलणी सुरू असून, याला राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाप्रमाणेच उपनगराध्यक्षपदही भाजपकडेच राहण्याची शक्यता निर्माण झाली. रत्नागिरी पालिकेत भाजपचे आठ, राष्ट्रवादीचे सहा, कॉँग्रेसचा एक, शिवसेनेचे १३ असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षांपूर्वी सेना-भाजप युतीने रत्नागिरीत राष्ट्रवादीची पालिकेतील सत्ता उलथवून पालिकेवर वर्चस्व मिळविले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवित सेना-भाजप युतीने सत्ता परिवर्तन घडवून आणले होते. युतीला २१ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद आपसात प्रत्येकी सव्वा वर्षासाठी वाटून घ्यायचे ठरविण्यात आले. पहिल्या सव्वा वर्षात नगराध्यक्षपद सेनेचे मिलिंद कीर यांना मिळाले, तर भाजपचे महेंद्र मयेकर यांना उपनगराध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर भाजपचे अशोक मयेकर पुढील सव्वा वर्षासाठी नगराध्यक्ष झाले. त्यावेळी उपाध्यक्षपद सेनेचे राहुल पंडित यांना देण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे बाळ माने हे रत्नागिरीचे उमेदवार असल्याने भाजपने अध्यक्षपदासाठी तीन महिन्यांची वाढीव मुदत मागितली. त्याला सेनेकडून मान्यता मिळाली. मात्र, त्यावेळी भाजपांतर्गत मोठे राजकारण घडले. महेंद्र मयेकर यांनी वेगळा गट स्थापन केल्याने अखेर बाळ माने यांनी अशोक मयेकर यांना थांबवत नगराध्यक्षपदाची माळ महेंद्र मयेकर यांच्या गळ्यात घालण्यास मान्यता दिली. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना-भाजपचे सूर अद्यापही न जुळल्याने या संधीचा फायदा घेत भाजपचे महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्षपद सोडणार नसल्याचे जाहीर करून टाकले. मयेकर यांनी अध्यक्षपद सोडावे, यासाठी सेनेने प्रयत्न केला. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मयेकर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठीही सेनेकडील सदस्यसंख्या अपुरी आहे. भाजपकडील नगराध्यक्षपद टिकविण्यासाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीपुढे ठेवला आहे. त्याबाबत बोलणी झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मंगळवारी उपाध्यक्षपदाची निवडणूक होत असली तरी आघाडी करण्यामागे आम्हाला उपाध्यक्षपद हवे, असा अर्थ नाही. भाजपकडेच अध्यक्षपदाप्रमाणे उपाध्यक्षपद राहणार आहे. राष्ट्रवादी केवळ सत्तेत सहभागी होणार आहे, असे सुदेश मयेकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सेनेच्या गोटात सन्नाटाभाजपने फेकलेला राजकीय फासा उलटविण्यासाठी शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू आहेत. कॉँग्रेसचे नगरसेवक कोणाबरोबर राहणार, राष्ट्रवादीतील काही नाराज सदस्यांचा गट पक्षाबाहेर पडणार का, अशी चर्चाही सुरू आहे. याआधी उपनगराध्यक्ष असलेले राहुल पंडित यांनी सव्वा वर्षानंतर राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेतर्फे उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण असाही सवाल निर्माण झाला असून, वरिष्ठ देतील तो उमेदवार असेल, असे सांगण्यात येते.सेना-भाजप आमने-सामनेअडीच वर्षांपूर्वी युती करून निवडणूक लढलेले सेना-भाजप आता मात्र उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. त्यामुळे भाजपने फेकलेला हा राजकीय फासा टिकणार की, सेना आपल्याच उमेदवाराला निवडून आणून राजकीय चमत्कार करणार, याबाबत आता रत्नागिरीकरांना उत्कंठा आहे.राष्ट्रवादी ‘व्हीप’ बजावणारभाजपबरोबर आघाडीचा आलेला प्रस्ताव आम्ही स्वीकारणार असून, उपनगराध्यक्षपद निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करण्यासाठी पक्षादेश (व्हीप) बजावला जाणार आहे, अशी माहिती पक्षप्रतोद मयेकर यांनी दिली.