शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडू लागले, महागाई वाढल्याने सामान्य हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या काळात सर्वत्र बंदी असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उसळी घेतली आहे. पेट्रोलने शंभरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या काळात सर्वत्र बंदी असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उसळी घेतली आहे. पेट्रोलने शंभरी तर डिझेलने नव्वदी ओलांडली आहे. सध्या सर्व व्यवसाय, उद्योग पूर्व क्षमतेने सुरू नाहीत. काहींवर अजूनही बेकारीची टांगती तलवार आहे. सामान्य माणसाचा रोजगारही थांबला आहे. अशातच इंधन दरवाढीमुळे किराणा, भाजीपाला यांची वाहतूकही महागली. त्यामुळे सामान्य नागरिकाचे दैनंदिन जीवनातील व्यवहारही कोलमडले आहेत.

कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून सगळे आर्थिक व्यवहार ठप्प केले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागताच जिल्ह्यासह देशभरात लाॅकडाऊन सुरू झाले. पहिल्या लाटेत जवळजवळ आठ महिने सर्व व्यवहार थांबलेले असल्याने अनेकांचे उद्योग, व्यवसाय बुडाले, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. सारेच आर्थिक व्यवहार थांबलेले असतानाच, लोकांचे रोजगार बुडालेले असतानाच पेट्रोल - डिझेल दरवाढीचा भडका उडू लागला. या काळात सुरूवातीला तर चार महिने सर्वच जिल्ह्यांतर्गत वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, मे २०२०मध्ये अनलाॅक होताच या इंधनांचे दर वाढू लागले. आतापर्यंत पेट्रोलने शंभरी तर डिझेलने नव्वदी ओलांडली आहे. याचा परिणाम डाळी, तेले तसेच अन्य खाद्यपदार्थ आणि भाज्यांची वाहतूक करण्यावर झाला आहे. या चढ्या दरामुळे आता वाहतुकीचे भाडेही वाढले आहे. त्यामुळे मंदीच्या काळातही लोकांना चढ्या दराने किराणा आणि विविध भाज्या खरेदी कराव्या लागत असल्याने गृहिणींचे आर्थिक गणित काेलमडले आहे.

एकंदरीत या सर्व इंधन दरवाढीने महागाई वाढू लागल्याने सामान्य माणूस त्रस्त होऊ लागला आहे.

शेतीही महागली...

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा परिणाम शेती क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोकणात ट्रॅक्टरऐवजी पाॅवर टिलरने शेती करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, पेट्रोल महागल्याने ही शेतीही महागली आहे. खते, बियाणे यांच्या वाहतुकीचे भाडे वाढले, त्यामुळे खते, बियाण्यांचे दरही वाढले. वाहतूक खर्च वाढल्याने शेती अवजारांच्या किमतीतही वाढ झाली आहे.

व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

लाॅकडाऊनचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल वाढल्याने वाहतुकीचे भाडेही आता वाढीव दराने घेत आहेत. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. भाज्या महागल्या, त्यातच आता पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने दुपारी ४ वाजेपर्यंतच व्यवसाय होतो. त्यामुळे भाज्यांचेही नुकसान होत आहे.

- शशिकांत लोखंडे, भाजी विक्रेता, रत्नागिरी

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने वाहतूकदारांचे भाडेही वाढले आहे. त्यामुळे आता डाळी, तेले यांचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर अन्य किराणा वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. वाहतूक दर वाढले आहेत. त्यातच आता दुकानांची वेळ मर्यादित असल्याने पुरेसा व्यवसाय होत नाही. मात्र, वाहतुकीचे भाडे भरमसाठ द्यावे लागत आहे.

- प्रदीप शिंदे, किराणा दुकानदार, रत्नागिरी

पत्ता कोबी ४० रुपये किलो

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा परिणाम दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तूंवर होत असून, वाहतूक महागल्याने भाज्यांचे दरही आता वाढू लागले आहेत. कोबी ४० रूपये किलो, मिरची ५० ते ६० रूपये किलो, काेथिंबीर २५ ते ३० रूपये जुडी आणि आले ६० रूपये किलो झाले आहे.

तेल स्वस्त, डाळ महाग

काही दिवसांपूर्वी तेल आणि डाळींचे दर वाढले होते. त्यामुळे तेलाचा दर १८० ते अगदी २०० रूपयांपर्यंत होता.

आता तेलाचा दर सहा ते सात रूपयांनी कमी झाला आहे. मात्र, डाळीेंचे दर अजूनही वाढलेले आहेत.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा परिणाम वाहतुकीच्या दरावर झाल्याने आता विविध वस्तूंचे दरही वाढले आहेत.

घर चालवताना गृहिणींची कसरत

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन केले आहे. अनेकांवर रोजगार बुडाल्याने उपाशी राहण्याची वेळ आली असतानाच आता पेट्रोल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू लागले आहेत. सर्वत्र महागाई वाढल्याने जगायचे कसे, हा सर्वसामान्य जनतेसमोर प्रश्न उभा राहिला आहे. कडधान्ये, भाजीपाला, धान्य, तेल आदी जीवनावश्यक वस्तूच महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे जीव मेटाकुटीला आला आहे.

- मेधा डोंगरे, रत्नागिरी

दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. त्यामुळे आता जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतानाही आवाक्याबाहेरचे होत आहे. प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या वस्तूची दरवाढ झाल्याचे वृत्त ऐकू येते, पेपरात वाचनात येते. आधीच कोरोनाने सगळ्या जगावर रोगाचे संकट आणले असतानाच त्यातून जगण्यासाठी आणावे लागणारे पदार्थही भरमसाठ किमतीने आणावे लागतात. यात सामान्यांची कसरत होत आहे. मात्र, त्याचे सरकारला काहीही नाही. या वाढत्या दरावर सरकार कधी नियंत्रण आणणार?

- सुविधा पाटील, रत्नागिरी