शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

संयमाचा गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे गेल्यावर्षीही गणेशभक्तांना आपल्या आवडत्या बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागला होता. ...

गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे गेल्यावर्षीही गणेशभक्तांना आपल्या आवडत्या बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला होता. साधारणत: जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची रुग्ण संख्या घटलेली होती. मात्र, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होळीला सुरुवात झाली. हाेळीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या गावी आले. त्यामुळे कोरोनाचा हाॅट-स्पाॅट असलेल्या मुंबईतून चाकरमान्यांच्या आगमनाने कोरोनाचा शिरकाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे या वर्षभरात कोरोनाचे रुग्ण भरमसाट वाढले आहेत. गेल्या आठ - नऊ महिन्यांची आकडेवारी काढली तर गेल्यावर्षीपेक्षा सुमारे ५० हजाराने रुग्ण वाढले आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली.

गेल्या पावणेदोन वर्षांपासून जिल्ह्याचा आरोग्य विभाग अथक दिवसरात्र काम करीत आहे. आता ही यंत्रणा खरंतर थकलेली आहे. पोलीस कर्मचारीही नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, यासाठी रस्त्यावर ऊन - पावसात काम करीत आहेत. या कोरोना योद्धयांना कोरोनाकाळात लढावे लागले, पण आताही त्यांचा लढा सुरूच आहे.

पहिल्या लाटेत होती, तशी कोरोनाची भीती आता नागरिकांमध्ये राहिलेली नाही. मात्र, ज्यांनी दुसऱ्या लाटेत रुग्णांची भरमसाट वाढलेली संख्या आणि त्यात गमावलेले आपले आप्त यांचे दु:ख अनुभवले आहे, त्यांना कोरोना संकट काय आहे, याचा चांगलाच प्रत्यय येत आहे. त्यामुळे कोरोना लवकरात लवकर या जगातूनच हद्दपार कर, असे आर्जव सारेच भक्त विघ्नहर्त्याकडे करीत आहेत.

कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असला तरी गेल्या गणेशोत्सवानंतर कोरोनाची भरमसाट वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन यावेळी या काळात संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करतानाच नागरिकांनाही या काळात कोरोनांच्या नियमांचे पालन करून सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला मुंबईहून येणाऱ्या तसेच स्थानिक नागरिकांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केले. त्यामुळेच सर्वत्र गणेशोत्सव योग्य खबरदारी घेत, कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा होताना दिसला. गणेशभक्तांनी दाखविलेल्या या संयत भक्तीमुळे यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने पण खऱ्या भक्तिभावाने साजरा होताना दिसत आहे.

कोरोनामुळे यावर्षीही कुठलेच कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन झालेले नाही. त्यामुळे खरंतर गणेशभक्त आणि मंडळे नाराज आहेत, पण मुळातच काेकणी माणसाकडे असलेला संयमीपणा यावेळच्या उत्सवावेळी दिसला आहे.