शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

संयमाचा गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे गेल्यावर्षीही गणेशभक्तांना आपल्या आवडत्या बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागला होता. ...

गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे गेल्यावर्षीही गणेशभक्तांना आपल्या आवडत्या बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला होता. साधारणत: जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची रुग्ण संख्या घटलेली होती. मात्र, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होळीला सुरुवात झाली. हाेळीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या गावी आले. त्यामुळे कोरोनाचा हाॅट-स्पाॅट असलेल्या मुंबईतून चाकरमान्यांच्या आगमनाने कोरोनाचा शिरकाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे या वर्षभरात कोरोनाचे रुग्ण भरमसाट वाढले आहेत. गेल्या आठ - नऊ महिन्यांची आकडेवारी काढली तर गेल्यावर्षीपेक्षा सुमारे ५० हजाराने रुग्ण वाढले आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली.

गेल्या पावणेदोन वर्षांपासून जिल्ह्याचा आरोग्य विभाग अथक दिवसरात्र काम करीत आहे. आता ही यंत्रणा खरंतर थकलेली आहे. पोलीस कर्मचारीही नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, यासाठी रस्त्यावर ऊन - पावसात काम करीत आहेत. या कोरोना योद्धयांना कोरोनाकाळात लढावे लागले, पण आताही त्यांचा लढा सुरूच आहे.

पहिल्या लाटेत होती, तशी कोरोनाची भीती आता नागरिकांमध्ये राहिलेली नाही. मात्र, ज्यांनी दुसऱ्या लाटेत रुग्णांची भरमसाट वाढलेली संख्या आणि त्यात गमावलेले आपले आप्त यांचे दु:ख अनुभवले आहे, त्यांना कोरोना संकट काय आहे, याचा चांगलाच प्रत्यय येत आहे. त्यामुळे कोरोना लवकरात लवकर या जगातूनच हद्दपार कर, असे आर्जव सारेच भक्त विघ्नहर्त्याकडे करीत आहेत.

कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असला तरी गेल्या गणेशोत्सवानंतर कोरोनाची भरमसाट वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन यावेळी या काळात संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करतानाच नागरिकांनाही या काळात कोरोनांच्या नियमांचे पालन करून सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला मुंबईहून येणाऱ्या तसेच स्थानिक नागरिकांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केले. त्यामुळेच सर्वत्र गणेशोत्सव योग्य खबरदारी घेत, कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा होताना दिसला. गणेशभक्तांनी दाखविलेल्या या संयत भक्तीमुळे यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने पण खऱ्या भक्तिभावाने साजरा होताना दिसत आहे.

कोरोनामुळे यावर्षीही कुठलेच कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन झालेले नाही. त्यामुळे खरंतर गणेशभक्त आणि मंडळे नाराज आहेत, पण मुळातच काेकणी माणसाकडे असलेला संयमीपणा यावेळच्या उत्सवावेळी दिसला आहे.