शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पेण येथील गणपती कोकण रेल्वेने रत्नागिरीत दाखल, गणेश चतुर्थीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अवघ्या भक्तांच्या लाडक्या बाप्पाच्या अर्थात गणेश चतुर्थी उत्सवाला दि. २ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ...

ठळक मुद्देगणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कार्यशाळांमध्ये कामाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : अवघ्या भक्तांच्या लाडक्या बाप्पाच्या अर्थात गणेश चतुर्थी उत्सवाला दि. २ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. अद्याप पावणे दोन महिन्यांचा अवकाश असला तरी गणेश मूर्ती कार्यशाळेत मूर्ती रेखाटण्याचे काम सुरू झाले आहे. पेणच्या गणेशमूर्तीचे भक्तांना प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे काही मूर्तिकार बांधव पेणहून गणेशमूर्ती आणत आहेत. रेल्वेने गणेशमूर्ती आणण्यात येत आहेत.बहुतांश मूर्तिकार बांधव अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गणपतीसाठी माती भिजवतात. शाडूच्या गणेशमूर्ती रेखाटण्यात येतात. शाडूच्या गणेशमूर्ती वाळण्यास अवधी लागतो. या मूर्ती वाळल्यानंतरच रंगकाम सुरू होते. अनेक मूर्तिकार लाल मातीपासूनही गणेशमूर्ती तयार करीत आहेत.गणेश मूर्ती रेखाटणाऱ्या कारखान्यात शाडूपासून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. कोरीव काम असल्यामुळे रेखाटण्यास उशिर लागतो. त्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता भासते. सध्या भात लागवडीची कामे सुरू असल्याने मजुरांची उपलब्धता होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.पेणच्या गणेशमूर्तींना भाविकांकडून विशेष मागणी असते. त्यामुळे अनेक व्यावसायिक पेण येथून रेल्वेने गणेशमूर्ती रत्नागिरीत घेऊन येतात. खासगी वाहनांपेक्षा रेल्वेतून गणेशमूर्ती सुरक्षित आणण्यास मदत होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. रत्नागिरीत आणण्यापूर्वी केवळ पांढरा रंग देऊन मूर्ती आणल्या जातात. मात्र, रत्नागिरीत गणेशमूर्ती आणल्यानंतर रंगकाम केले जाते. सध्या रंगकाम न केलेल्या गणेशमूर्ती रेल्वेतून सुरक्षित आणण्यात येत आहेत.श्रावण निम्मा झाला की, मूर्तिकार रंगकामाला प्रारंभ करतात. शहरात तर पेणच्या रंगकाम तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्रीचे दालन उभारले जाते. शाडू माती गुजरात राज्यातून आणली जाते. इंधन दरातील वाढीमुळे शाडू माती, रंग साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय मजुरीतील वाढीमुळे यावर्षी किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे