शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST

शासकीय कार्यालयांमध्ये ठेकेदारी पद्धत सुरु झाल्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांचे हाल सुरु झाले आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी सुशिक्षित असो वा ...

शासकीय कार्यालयांमध्ये ठेकेदारी पद्धत सुरु झाल्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांचे हाल सुरु झाले आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी सुशिक्षित असो वा अशिक्षित सर्वजण नाईलाजास्तव ठेकेदाराच्या हाताखाली काम करण्यास तयार होतात. ठेकेदारी पद्धत पूर्वी खासगी क्षेत्रात होती. त्यानंतर शासकीय कार्यालयांतही ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यास सुरुवात झाली. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करुनही वेळेवर मानधन मिळत नसल्याची कितीही ओरड करण्यात आली तरी त्यांची गळचेपी करण्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात येते. हे फार पूर्वीपासूनच सुरु आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राबराब राबायचे आणि त्यांचा महिना भरला की त्यांना वेगवेगळी कारणे देऊन मानधनासाठी रडवत ठेवायचे, असाच प्रकार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरु आहेत. शिक्षकांना तीन वर्षांसाठी मानधनावर काम करावे लागत होते. मात्र, त्यांना तीन वर्षांनंतर कायम करण्यात येत होते. त्यामुळे कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न तीन वर्षांनंतर कायमचा मार्गी लागत होता. मात्र, एनआरएचएम, पाणी स्वच्छता विभाग, डाटा एन्ट्री ऑपरेटर व अन्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यांच्या डोक्यावर नोकरी कधीही जाईल, याची टांगती तलवार कायमचीच ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचे हाल सुरु आहेत. काम करुनही दोनवेळचा घास खाण्यासाठी वेळेवर दाम मिळत नसेल तर त्यांच्यासारखे दुर्दैवी काेणीही नाहीत, असेच म्हणावे लागेल.

सगळ्याच क्षेत्रात सध्या खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. हा राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा असला तरी राज्य, जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत पातळीवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या कर्मचारी, कामगारांची जी परिस्थिती आहे ती फार वाईट आहे. त्यामुळे खासगीकरणाला विरोध होत आहे तो चुकीचा नाही. खासगीकरणामुळे कर्मचारी, कामगारांचेच नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था फार बिकट आहे. शासनाकडून एखाद्या कंपनी किंवा व्यक्तीकडे कंत्राट दिल्यानंतर त्याच्याकडून मिळणारे मानधन अत्यल्प असते. तेही वेळेवर मिळत नसेल तर त्या कर्मचारी, कामगारावर उपाशी राहण्याची वेळ येणार, हे निश्चित आहे. शासनाकडून कंत्राटदाराला देण्यात येणाऱ्या मानधनाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम कंत्राटी कर्मचारी, कामगारांना दिली जाते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. अनेकदा कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचारी, कामगारांकडून काम करुन घेतले जाते मात्र त्यांना मानधनाची रक्कम दिली जात नाही, असे प्रकार अनेकदा घडले आहेत आणि आताही सुरूच आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना शासनाकडून वेसण घालणे अत्यंत गरजेचे आहे. तरच कंत्राटी कर्मचारी, कामगारांना न्याय मिळेल.

आजही शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग व अन्य विभागांत अनेकजण गेली १०-१२ वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अजूनही कायम करण्यात आलेले नाही. त्यांना कायम करण्यात यावे, यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे आता अशा हजारो कर्मचाऱ्यांचे वयोमान जास्त झाल्याने त्यांच्यासमोर भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळणे दूरच राहिले आहे. इतकी वर्षे कंत्राटी सेवा करुनही त्यांच्या पदरी निराशाच आहे. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा विचार करणे गरजेचे आहे.