शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST

शासकीय कार्यालयांमध्ये ठेकेदारी पद्धत सुरु झाल्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांचे हाल सुरु झाले आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी सुशिक्षित असो वा ...

शासकीय कार्यालयांमध्ये ठेकेदारी पद्धत सुरु झाल्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांचे हाल सुरु झाले आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी सुशिक्षित असो वा अशिक्षित सर्वजण नाईलाजास्तव ठेकेदाराच्या हाताखाली काम करण्यास तयार होतात. ठेकेदारी पद्धत पूर्वी खासगी क्षेत्रात होती. त्यानंतर शासकीय कार्यालयांतही ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यास सुरुवात झाली. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करुनही वेळेवर मानधन मिळत नसल्याची कितीही ओरड करण्यात आली तरी त्यांची गळचेपी करण्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात येते. हे फार पूर्वीपासूनच सुरु आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राबराब राबायचे आणि त्यांचा महिना भरला की त्यांना वेगवेगळी कारणे देऊन मानधनासाठी रडवत ठेवायचे, असाच प्रकार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरु आहेत. शिक्षकांना तीन वर्षांसाठी मानधनावर काम करावे लागत होते. मात्र, त्यांना तीन वर्षांनंतर कायम करण्यात येत होते. त्यामुळे कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न तीन वर्षांनंतर कायमचा मार्गी लागत होता. मात्र, एनआरएचएम, पाणी स्वच्छता विभाग, डाटा एन्ट्री ऑपरेटर व अन्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यांच्या डोक्यावर नोकरी कधीही जाईल, याची टांगती तलवार कायमचीच ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचे हाल सुरु आहेत. काम करुनही दोनवेळचा घास खाण्यासाठी वेळेवर दाम मिळत नसेल तर त्यांच्यासारखे दुर्दैवी काेणीही नाहीत, असेच म्हणावे लागेल.

सगळ्याच क्षेत्रात सध्या खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. हा राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा असला तरी राज्य, जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत पातळीवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या कर्मचारी, कामगारांची जी परिस्थिती आहे ती फार वाईट आहे. त्यामुळे खासगीकरणाला विरोध होत आहे तो चुकीचा नाही. खासगीकरणामुळे कर्मचारी, कामगारांचेच नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था फार बिकट आहे. शासनाकडून एखाद्या कंपनी किंवा व्यक्तीकडे कंत्राट दिल्यानंतर त्याच्याकडून मिळणारे मानधन अत्यल्प असते. तेही वेळेवर मिळत नसेल तर त्या कर्मचारी, कामगारावर उपाशी राहण्याची वेळ येणार, हे निश्चित आहे. शासनाकडून कंत्राटदाराला देण्यात येणाऱ्या मानधनाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम कंत्राटी कर्मचारी, कामगारांना दिली जाते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. अनेकदा कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचारी, कामगारांकडून काम करुन घेतले जाते मात्र त्यांना मानधनाची रक्कम दिली जात नाही, असे प्रकार अनेकदा घडले आहेत आणि आताही सुरूच आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना शासनाकडून वेसण घालणे अत्यंत गरजेचे आहे. तरच कंत्राटी कर्मचारी, कामगारांना न्याय मिळेल.

आजही शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग व अन्य विभागांत अनेकजण गेली १०-१२ वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अजूनही कायम करण्यात आलेले नाही. त्यांना कायम करण्यात यावे, यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे आता अशा हजारो कर्मचाऱ्यांचे वयोमान जास्त झाल्याने त्यांच्यासमोर भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळणे दूरच राहिले आहे. इतकी वर्षे कंत्राटी सेवा करुनही त्यांच्या पदरी निराशाच आहे. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा विचार करणे गरजेचे आहे.