शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

शुभम सावंतवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: October 17, 2014 00:40 IST

हुडहुड’ग्रस्त भागात शहीद : माजगाव लोटले अंत्ययात्रेत

सावंतवाडी : आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीवर आलेल्या ‘हुडहुड’ या चक्रीवादळामुळे विशाखापट्टणम येथे नुकसान झालेल्या भागात मदतकार्य पोहोचविताना सावंतवाडी माजगाव येथील जवान शुभम उदय सावंत (वय २२) शहीद झाला. त्यांचा मृतदेह पाच दिवसांनी आज, गुरुवारी त्यांच्या मूळगावी माजगाव येथे आणण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. त्यांच्या आई-वडिलांसह जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींनी शुभमचे दर्शन घेतल्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘हुडहुड’ हे ताशी १७० ते १८० किलोमीटर वेगाने चक्रीवादळ आले होते. यात विशाखापट्टणममध्ये मोठी हानी झाली. या वादळात सापडलेल्या लोकांना मदत आणि बचाव कार्यासाठी नौदलाची पथके पाठविण्यात आली होती. त्यात माजगाव येथील शुभम सावंत यांच्यासह पाचजणांचे पथकही होते. ते विशाखापट्टणम येथे कार्यरत होते.रविवारी (११ आॅक्टोबर) सकाळच्या सुमारास नौदलाचे पथक कार्यरत असतानाच वादळामुळे पडलेली झाडे बाजूला करीत असतानाच एक झाड शुभम यांच्या अंगावर पडले. त्यात गंभीर जखमी झालेल्या शुभम यांना विशाखापट्टणम येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्याचदिवशी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. शुभमसोबतच्या अन्य युवकांचाही यावेळी मृत्यू झाला आहे. विशाखापट्टणम येथे वादळाने सर्व दूरध्वनी व भ्रमणध्वनी यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शुभम यांच्या घरच्यांना रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास याबाबत माहिती देण्यात आली.अंत्यसंस्कारापूर्वी नौदलाच्या एका तुकडीने तसेच नंतर पोलिसांनी गोळीबाराच्या हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, डी. जी. सावंत, सरपंच आबा सावंत, सभापती प्रमोद सावंत, तहसीलदार सतीश कदम, पोलीस निरीक्षक रणजित देसाई, दाजी वारंग, रेश्मा सावंत, अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, अ‍ॅड. शाम सावंत, चंद्रकांत कासार, भाऊ सावंत, उपसरपंच अमिदी मेस्त्री, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)वीरांसाठीची स्मशानभूमीशुभम सावंत यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी यापूर्वी सीमेवर शहीद झालेल्या दीपक सावंत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे ही जागा वीरांसाठी असल्याचे गावकरी सांगत होते.