शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कंदिलाच्या उजेडात करावे लागतायत अंत्यसंस्कार- स्मशानभूमीच्या मरणयातना...

By admin | Updated: August 5, 2014 00:09 IST

चाफळवासीयांची कुचंबना :

हणमंत यादव - चाफळ , येथील स्मशानभूमी शेडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसेच येथे विजेचीही सोय नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी कंदील, बॅटरी अथवा दिव्याच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. परिणामी, चाफळवासीयांना मरणानंतरही मरणयातना सोसाव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीसह, लोकप्रतिनीधींनी याकडे कानाडोळा केल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चाफळची राजकीय सत्तास्थाने परस्पर विरोधी गटांमध्ये विभागलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य म्हणून राजेश पवार तर जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून डी. बी. वेल्हाळ हे देसाई गटाचे नेतृत्व करत आहेत. ग्रामपंचायतसुध्दा देसाई गटाच्याच ताब्यात आहे. असे असताना या दोन्ही नेत्यांना स्वत:च्या गावातील स्मशानभूमी शेडसाठी निधी मिळवता येत नसल्याने विभागात हा विषय चर्चेचा ठरू लागला आहे. सध्या येथील स्मशानभूमी शेडचा पत्रा पूर्णपणे सडला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत पाणी साचत आहे. यातच पावसात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे पाण्यासह विजेची सोय नाही. ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत सौरऊर्जा दिवे देण्यात आले होते, मात्र याठिकाणी एकही सौरदिवा न बसविल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना रॉकेलचे दिवे बनवून अंत्यविधी करावा लागत आहे. नवीन स्मशानभूमी शेडसह सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामपंचायतीसह या दोन्ही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी शेडसाठी निधीची तरतूद करुन रस्ता, वीज, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, नातेवाइकांना थांबण्यासाठी इमारत बांधून परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.- धोंडिराम हिंंदोळे,  ग्रामस्थसातारा जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करताना ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर अडचणींमध्ये आणखीनच भर पडते. खाचखळग्यांनी भरलेला रस्ता, कोसळणारा पाऊस, ना विजेची सोय ना निवारा अशा दिव्यातून नदीकाठी जाऊन भरपावसात उघड्यावर अग्निसंस्कार करावा लागतो. विविध गावच्या स्मशानभूमींच्या अशा प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारी ‘स्मशानभूमीच्या मरणयातना’ ही मालिका ‘लोकमत’ आजपासून सुरू करीत आहे.