शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कंदिलाच्या उजेडात करावे लागतायत अंत्यसंस्कार- स्मशानभूमीच्या मरणयातना...

By admin | Updated: August 5, 2014 00:09 IST

चाफळवासीयांची कुचंबना :

हणमंत यादव - चाफळ , येथील स्मशानभूमी शेडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसेच येथे विजेचीही सोय नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी कंदील, बॅटरी अथवा दिव्याच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. परिणामी, चाफळवासीयांना मरणानंतरही मरणयातना सोसाव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीसह, लोकप्रतिनीधींनी याकडे कानाडोळा केल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चाफळची राजकीय सत्तास्थाने परस्पर विरोधी गटांमध्ये विभागलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य म्हणून राजेश पवार तर जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून डी. बी. वेल्हाळ हे देसाई गटाचे नेतृत्व करत आहेत. ग्रामपंचायतसुध्दा देसाई गटाच्याच ताब्यात आहे. असे असताना या दोन्ही नेत्यांना स्वत:च्या गावातील स्मशानभूमी शेडसाठी निधी मिळवता येत नसल्याने विभागात हा विषय चर्चेचा ठरू लागला आहे. सध्या येथील स्मशानभूमी शेडचा पत्रा पूर्णपणे सडला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत पाणी साचत आहे. यातच पावसात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे पाण्यासह विजेची सोय नाही. ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत सौरऊर्जा दिवे देण्यात आले होते, मात्र याठिकाणी एकही सौरदिवा न बसविल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना रॉकेलचे दिवे बनवून अंत्यविधी करावा लागत आहे. नवीन स्मशानभूमी शेडसह सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामपंचायतीसह या दोन्ही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी शेडसाठी निधीची तरतूद करुन रस्ता, वीज, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, नातेवाइकांना थांबण्यासाठी इमारत बांधून परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.- धोंडिराम हिंंदोळे,  ग्रामस्थसातारा जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करताना ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर अडचणींमध्ये आणखीनच भर पडते. खाचखळग्यांनी भरलेला रस्ता, कोसळणारा पाऊस, ना विजेची सोय ना निवारा अशा दिव्यातून नदीकाठी जाऊन भरपावसात उघड्यावर अग्निसंस्कार करावा लागतो. विविध गावच्या स्मशानभूमींच्या अशा प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारी ‘स्मशानभूमीच्या मरणयातना’ ही मालिका ‘लोकमत’ आजपासून सुरू करीत आहे.