शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

यांत्रिकीकरणाचा निधी परतीच्या मार्गावर

By admin | Updated: March 23, 2016 00:42 IST

कृषी योजना थंड : दोन वर्षांचे ११५ लाख रुपये शिल्लक

रत्नागिरी : शेतकरी अवजारांच्या यांत्रिकीकरणासाठी कृषी विभागाकडून योजना राबवण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांकडून अवजारांचा उठाव होत नसल्यामुळे या योजनेसाठी आलेला निधी अद्याप पडून आहे. आर्थिक वर्ष समाप्तीस अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने हा निधी खर्ची पडणे मुश्किल आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत दोन वर्षाचा तब्बल ११५ लाखाचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजना उपअभियान कृषी विभागातर्फे राबवण्यात येते. गतवर्षी (२०१४-१५) यांत्रिकीकरणासाठी ८१ लाख ९८ हजारांचा निधी कृषी विभागाकडे प्राप्त झाला होता. पॉवर टिलरसाठी ५६, तर ट्रॅक्टरसाठी ३ प्रस्ताव शेतकऱ्यांनी आॅनलाईन पाठवले होते. पैकी २० शेतकऱ्यांना पॉवरटिलरचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांकडूनच अवजारांचा उठाव होत नसल्यामुळे गतवर्षीचा २८ लाखाचा निधी शिल्लक राहिला आहे. यावर्षी (२०१५-१६) जिल्ह्यासाठी ८७ लाख ७८ हजारांचा निधी मंजूर झाला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १९९ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र केवळ दोनच शेतकऱ्यांनी पैसे भरल्याने त्यांना अवजारांचे वितरण केले जाणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून अवजारांचा उठाव झालेला नाही. त्यामुळे निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यांत्रिकीकरणांतर्गत पॉवरटिलर, ग्रासकटर, ट्रॅक्टर, रोटावेटरमशीन ५० ते ४० टक्के अनुदानावर वितरीत करण्यात येतात. शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्जाद्वारे मागणी केल्यानंतर कृषी विभागाकडून त्यास अवजारे खरेदीसाठी मान्यता दिली जाते. तद्नंतर शेतकऱ्यांना संबंधित अवजारांची शंभर टक्के रक्कम भरून एमईडीसीकडून अवजारे खरेदी करावी लागतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाते. असे असताना शेतकऱ्यांच्या प्रस्तावास कृषी विभागाने मान्यता देऊनही अवजारांचा उठाव केला जात नसल्यामुळे यांत्रिकीकरणाचा निधी शिल्लक राहिला आहे. गतवर्षीचा २८ लाख व यावर्षीचा ८७ लाख ७८ हजार मिळून ११५ लाखांचा निधी आर्थिक वर्ष समाप्तीमुळे परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन योजना : अवजारे खरेदी नसल्यानेच रक्कम शिल्लककृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी यांत्रिक अवजारे अनुदानावर वितरीत केली जातात. शेतकऱ्यांसाठी संबंधित योजना आॅनलाईन असून, कृषी विभागाकडून तात्काळ मान्यता दिली जाते. परंतु, शेतकऱ्यांकडून अवजारे खरेदी केली जात नसल्यामुळेच अनुदानाची रक्कम शिल्लक राहिली आहे. गतवर्षीबरोबर यावर्षीचाही निधी शिल्लक राहणार असल्याने मार्चनंतर संबंधित निधी परत पाठवावा लागणार आहे.- आरीफ शहा, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.