शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणाचा निधी परतीच्या मार्गावर

By admin | Updated: March 23, 2016 00:42 IST

कृषी योजना थंड : दोन वर्षांचे ११५ लाख रुपये शिल्लक

रत्नागिरी : शेतकरी अवजारांच्या यांत्रिकीकरणासाठी कृषी विभागाकडून योजना राबवण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांकडून अवजारांचा उठाव होत नसल्यामुळे या योजनेसाठी आलेला निधी अद्याप पडून आहे. आर्थिक वर्ष समाप्तीस अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने हा निधी खर्ची पडणे मुश्किल आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत दोन वर्षाचा तब्बल ११५ लाखाचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजना उपअभियान कृषी विभागातर्फे राबवण्यात येते. गतवर्षी (२०१४-१५) यांत्रिकीकरणासाठी ८१ लाख ९८ हजारांचा निधी कृषी विभागाकडे प्राप्त झाला होता. पॉवर टिलरसाठी ५६, तर ट्रॅक्टरसाठी ३ प्रस्ताव शेतकऱ्यांनी आॅनलाईन पाठवले होते. पैकी २० शेतकऱ्यांना पॉवरटिलरचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांकडूनच अवजारांचा उठाव होत नसल्यामुळे गतवर्षीचा २८ लाखाचा निधी शिल्लक राहिला आहे. यावर्षी (२०१५-१६) जिल्ह्यासाठी ८७ लाख ७८ हजारांचा निधी मंजूर झाला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १९९ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र केवळ दोनच शेतकऱ्यांनी पैसे भरल्याने त्यांना अवजारांचे वितरण केले जाणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून अवजारांचा उठाव झालेला नाही. त्यामुळे निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यांत्रिकीकरणांतर्गत पॉवरटिलर, ग्रासकटर, ट्रॅक्टर, रोटावेटरमशीन ५० ते ४० टक्के अनुदानावर वितरीत करण्यात येतात. शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्जाद्वारे मागणी केल्यानंतर कृषी विभागाकडून त्यास अवजारे खरेदीसाठी मान्यता दिली जाते. तद्नंतर शेतकऱ्यांना संबंधित अवजारांची शंभर टक्के रक्कम भरून एमईडीसीकडून अवजारे खरेदी करावी लागतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाते. असे असताना शेतकऱ्यांच्या प्रस्तावास कृषी विभागाने मान्यता देऊनही अवजारांचा उठाव केला जात नसल्यामुळे यांत्रिकीकरणाचा निधी शिल्लक राहिला आहे. गतवर्षीचा २८ लाख व यावर्षीचा ८७ लाख ७८ हजार मिळून ११५ लाखांचा निधी आर्थिक वर्ष समाप्तीमुळे परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन योजना : अवजारे खरेदी नसल्यानेच रक्कम शिल्लककृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी यांत्रिक अवजारे अनुदानावर वितरीत केली जातात. शेतकऱ्यांसाठी संबंधित योजना आॅनलाईन असून, कृषी विभागाकडून तात्काळ मान्यता दिली जाते. परंतु, शेतकऱ्यांकडून अवजारे खरेदी केली जात नसल्यामुळेच अनुदानाची रक्कम शिल्लक राहिली आहे. गतवर्षीबरोबर यावर्षीचाही निधी शिल्लक राहणार असल्याने मार्चनंतर संबंधित निधी परत पाठवावा लागणार आहे.- आरीफ शहा, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.