शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वित्त आयोगाचा निधी निविदांअभावी ठप्प

By admin | Updated: December 12, 2015 00:19 IST

लांजा पंचायत समिती : विकासकामांबाबत सभेत चर्चा

लांजा : तेराव्या वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी खर्च झाला पाहिजे. त्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर निविदा काढून विंंधन विहिरींचे प्रस्ताव त्वरित द्यावेत. शेतकऱ्यांना आंबा नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, असा महत्वपूर्ण ठराव लांजा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.या मासिक सभेत विविध विकासकामांबाबत चर्चा करून काही महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. या सभेला सभापती दीपाली दळवी, उपसभापती आदेश आंबोलकर, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मणचेकर, युवराज हांदे, लक्ष्मण मोरये, लिला घडशी, प्रियांका रसाळ, गटविकास अधिकारी परब, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांच्यासह विविध खात्यांतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी बांधकाम विभागावर चर्चा करताना स्थानिक विकास व डोंगरी विकास योजनेतील मंजूर झालेल्या कामांची निविदा अद्याप काढण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर तेराव्या वित्त आयोगाचा निधी अद्याप खर्च झाला नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर बोलताना सभापतींनी सांगितले की, या सर्व कामांच्या निविदा काढून डिसेंबरपर्यंत सर्व निधी खर्च झाला पाहिजे, असे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर चर्चा करताना यावर्षी कमी पाऊस पडला असल्याने तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक उद्भवण्याची शक्यता पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मोरये यांनी व्यक्त केली. यावर संबंधित विभाकडून विस्तृत माहिती घेण्यात आली. त्यानंतर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावनिहाय विंधन विहिरींचे प्रस्ताव मागवून त्यांचाही आराखड्यामध्ये समावेश करण्याची सूचना करण्यात आली. तालुक्यात लोकसहभागातून जास्तीत जास्त बंधारे बांधून घ्यावेत तसेच ज्या ज्या गावामध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवावेत, अशी सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आली. शिक्षण विभागावर चर्चा करताना काही ठिकाणी पोषण आहाराचे धान्य योग्यरित्या ठेवले जात नसल्याचे सांगण्यात आले. यावर बोलताना सभापती दीपाली दळवी यांनी सांगितले की, मुलांच्या पोषण आहाराच्या धान्यामध्ये हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पोषण आहाराचे धान्य सुरक्षित ठेवण्यात आले आहे की नाही, याची पाहणी अधिकाऱ्यांनी करावी. याबाबतचा अहवाल त्वरित द्यावा, त्याचबरोबर नादुरुस्त अंगणवाडी इमारतीमध्ये मुलांना बसवू नये. विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावा. तालुक्यातील नादुरूस्त शाळा व अंगणवाड्यांची माहिती घेऊन त्या दुरुस्त करण्याचा व काही ठिकाणी नवीन वर्गखोल्या घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तालुक्यातील मुलींसाठी मोफत एमएससीआयटी प्रशिक्षण, संगणक दुरूस्ती प्रशिक्षण व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा योजना पंचायत समितीस्तरावर राबवण्याचे निश्चित करण्यात आले.आरोग्य विभागावर चर्चा करताना जलशुध्दिकरणावर जास्त भर देण्यात आला. मेडिक्लोरसारखी औषधे पंचायती समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेत पल्स पोलिओ मोहीमसुध्दा राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याचा प्रश्न पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मणचेकर यांनी उपस्थित केला. आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरून घेण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. (प्रतिनिधी)सभेत मंजुरी : साहित्य खरेदीचा विषयशेतकऱ्यांना सबसिडीतून भाजीपाला बियाणे, कृषी साहित्य, आंबा व काजू फवारणीसाठी औषधे, सौरकंदील, अपंगांसाठी घरघंटी, मागासवर्गीयांसाठी सौर पथदीप व निकषांमध्ये बसणाऱ्या बायोगॅससाठी साहित्य खरेदी करण्यास या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.अधिकाऱ्यांना सूचनाशेतीपंपाची कनेक्शन्स त्वरित द्यावीत, गंजलेले व धोकादायक पोल बदलण्यात यावेत, जनावरांना पायलागाची लस देण्यात यावी याबाबत सूचना दिल्या.तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च झाला पाहिजे.विंधन विहिरींचे प्रस्ताव त्वरित द्यावेत.महत्त्वाच्या विषयांवर मासिक सभेत ठराव.पोषण आहाराबाबत सूचना.