शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बाधित बागायतदारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

By admin | Updated: August 10, 2015 00:35 IST

जैतापूर अणुऊर्जा : बागायतींचा मोबदला अन्यथा जमिनी परत द्या

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये संपादित झालेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांना तसे निवेदन सादर केले आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या आंबा बागायती कायमस्वरूपी संपादित करण्यात आल्या आहेत. वेळोवेळी मागणी करूनही शासनाकडून अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाधिकारी शेतकऱ्यांना संपादित जागेमध्ये जाण्यास मज्जाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बागायती, जमिनी बळकावून मोबदला न देता त्यांच्याकडून उत्पन्न हिरावून घेण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचे निश्चित केले आहे.शेतकऱ्यांकडून लेखी निवेदने, पाठपुरावा करूनसुध्दा दखल घेण्यात येत नाही. गतवर्षी १५ आॅगस्ट २०१४ रोजी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु तत्कालिन जिल्हाधिकारी व प्रातांधिकाऱ्यांनी नंदकुमार राऊत यांना ११ आॅगस्ट २०१४ रोजी पत्र पाठवून उपोषणास बसू नका, आपल प्रस्ताव महिनाभरात पुढील कार्यवाहीसाठी पाठवितो, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनसुध्दा त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. २६ जानेवारी २०१५ला पुन्हा शेतकरी उपोषणाला बसले असता त्यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून आंबा बागायत अहवालाची प्रत शासनाकडे पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी व बागायतदारांशी चर्चा करून संबंधित त्रुटीची पूर्तता करण्यात येईल, तसेच पुनर्मूल्यांकनासाठी दोन ते अडीच लाख रूपये खर्च आहे, त्यासंबंधीचा प्रस्ताव एनपीसीआयएल यांच्याकडे मागणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाचा आजपर्यंत खुलासा झालेला नाही. एनपीसीआयएल किंवा प्रशासन बागायतींचा मोबादला देण्यास तर तयार नसेल तर जमिनी शेतकऱ्यांना परत करा अथवा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)