शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बाधित बागायतदारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

By admin | Updated: August 10, 2015 00:35 IST

जैतापूर अणुऊर्जा : बागायतींचा मोबदला अन्यथा जमिनी परत द्या

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये संपादित झालेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांना तसे निवेदन सादर केले आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या आंबा बागायती कायमस्वरूपी संपादित करण्यात आल्या आहेत. वेळोवेळी मागणी करूनही शासनाकडून अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाधिकारी शेतकऱ्यांना संपादित जागेमध्ये जाण्यास मज्जाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बागायती, जमिनी बळकावून मोबदला न देता त्यांच्याकडून उत्पन्न हिरावून घेण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचे निश्चित केले आहे.शेतकऱ्यांकडून लेखी निवेदने, पाठपुरावा करूनसुध्दा दखल घेण्यात येत नाही. गतवर्षी १५ आॅगस्ट २०१४ रोजी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु तत्कालिन जिल्हाधिकारी व प्रातांधिकाऱ्यांनी नंदकुमार राऊत यांना ११ आॅगस्ट २०१४ रोजी पत्र पाठवून उपोषणास बसू नका, आपल प्रस्ताव महिनाभरात पुढील कार्यवाहीसाठी पाठवितो, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनसुध्दा त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. २६ जानेवारी २०१५ला पुन्हा शेतकरी उपोषणाला बसले असता त्यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून आंबा बागायत अहवालाची प्रत शासनाकडे पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी व बागायतदारांशी चर्चा करून संबंधित त्रुटीची पूर्तता करण्यात येईल, तसेच पुनर्मूल्यांकनासाठी दोन ते अडीच लाख रूपये खर्च आहे, त्यासंबंधीचा प्रस्ताव एनपीसीआयएल यांच्याकडे मागणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाचा आजपर्यंत खुलासा झालेला नाही. एनपीसीआयएल किंवा प्रशासन बागायतींचा मोबादला देण्यास तर तयार नसेल तर जमिनी शेतकऱ्यांना परत करा अथवा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)