शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

बाधित बागायतदारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

By admin | Updated: August 10, 2015 00:35 IST

जैतापूर अणुऊर्जा : बागायतींचा मोबदला अन्यथा जमिनी परत द्या

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये संपादित झालेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांना तसे निवेदन सादर केले आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या आंबा बागायती कायमस्वरूपी संपादित करण्यात आल्या आहेत. वेळोवेळी मागणी करूनही शासनाकडून अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाधिकारी शेतकऱ्यांना संपादित जागेमध्ये जाण्यास मज्जाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बागायती, जमिनी बळकावून मोबदला न देता त्यांच्याकडून उत्पन्न हिरावून घेण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचे निश्चित केले आहे.शेतकऱ्यांकडून लेखी निवेदने, पाठपुरावा करूनसुध्दा दखल घेण्यात येत नाही. गतवर्षी १५ आॅगस्ट २०१४ रोजी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु तत्कालिन जिल्हाधिकारी व प्रातांधिकाऱ्यांनी नंदकुमार राऊत यांना ११ आॅगस्ट २०१४ रोजी पत्र पाठवून उपोषणास बसू नका, आपल प्रस्ताव महिनाभरात पुढील कार्यवाहीसाठी पाठवितो, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनसुध्दा त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. २६ जानेवारी २०१५ला पुन्हा शेतकरी उपोषणाला बसले असता त्यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून आंबा बागायत अहवालाची प्रत शासनाकडे पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी व बागायतदारांशी चर्चा करून संबंधित त्रुटीची पूर्तता करण्यात येईल, तसेच पुनर्मूल्यांकनासाठी दोन ते अडीच लाख रूपये खर्च आहे, त्यासंबंधीचा प्रस्ताव एनपीसीआयएल यांच्याकडे मागणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाचा आजपर्यंत खुलासा झालेला नाही. एनपीसीआयएल किंवा प्रशासन बागायतींचा मोबादला देण्यास तर तयार नसेल तर जमिनी शेतकऱ्यांना परत करा अथवा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)