शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कंपनीकडून फसवणूक

By admin | Updated: January 16, 2016 23:46 IST

अजित यशवंतराव : ग्रामस्थांची फसगत झाल्याचा आरोप

राजापूर : राजापूर तालुका व परिसरातील बेरोजगार तरूणांना नोकरीची अमिषे दाखवून व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, वेत्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या जमिनी बळकावू पाहणाऱ्या कोलकाता येथील आयलॉग पोर्टचा बंदर प्रकल्प कंपनीकडून केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाचीही फसवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी केला आहे. या परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांची व शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावात वस्तुस्थितीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या आयलॉग पोर्ट बंदर प्रकल्प कंपनी विरोधात आता कायदेशीर कारवाईच्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचेही अजित यशवंतराव यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रकही त्यांनी दिले आहे. राजापूर तालुक्यात यापूर्वी राजापूर शिपयार्ड या कंपनीकडून वाडा, वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली आहे. या शेतकऱ्यांनी सध्या या कंपनीविरोधात लढा पुकारला आहे. ही फसवणूक ताजी असतानाच आता कोलकातातील आयलॉग पोर्ट बंदर प्रकल्प कंपनीकडूनही अशाप्रकारे नाटे आंबोळगड किनाऱ्यावर वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची बाब पुढे आली आहे. या विरोधात आता या परिसरातील शेतकऱ्यांनीही संघटीतपणे लढा देण्याचा निर्धार केला आहे. याला राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जर अशाप्रकारे कोणतीही कंपनी तालुक्यात येऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणार असेल तर आम्ही ते कदापीही सहन करणार नाही, असे स्पष्ट करत ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे यशवंतराव यांनी स्पष्ट केले आहे. या कंपनीकडून शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाची देखील फसवणूक करण्यात आल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. (प्रतिनिधी) खोटी माहिती? : कंपनीचा अहवाल चुकीचा? या प्रकल्पस्थळापासून जवळपास २.५० कि. मी. क्षेत्रामध्ये मनुष्यवस्ती आणि घरे नाहीत असे अहवालात नमुद करण्यात आले असले तरी प्रकल्पक्षेत्राच्या जवळच १ ते १.५० कि. मी. परिसरात आंबोळगड हे गाव वसलेले आहे. दोन कि. मी. अंतरावर तिवरे तर पुढे वेत्ये ही गावे आहेत. शासनाकडून व पर्यावरण मंडळाकडून परवाना मिळवण्यासाठी कंपनीकडून खोटी माहिती देण्यात आली आहे. तसेच जैविक पर्यावरण अहवालामध्ये तर अभ्यास क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरात जंगले नाहीत असे नमुद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या परिसरात नाटे, पडवणे व वेत्ये गावातील अनेक शेतकऱ्यांच्या कलमाच्या बागा असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. गुन्हा दाखल करा कंपनी चुकीचा अहवाल तयार करून फसवणूक करत आहे. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले.