शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीकडून फसवणूक

By admin | Updated: January 16, 2016 23:46 IST

अजित यशवंतराव : ग्रामस्थांची फसगत झाल्याचा आरोप

राजापूर : राजापूर तालुका व परिसरातील बेरोजगार तरूणांना नोकरीची अमिषे दाखवून व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, वेत्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या जमिनी बळकावू पाहणाऱ्या कोलकाता येथील आयलॉग पोर्टचा बंदर प्रकल्प कंपनीकडून केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाचीही फसवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी केला आहे. या परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांची व शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावात वस्तुस्थितीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या आयलॉग पोर्ट बंदर प्रकल्प कंपनी विरोधात आता कायदेशीर कारवाईच्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचेही अजित यशवंतराव यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रकही त्यांनी दिले आहे. राजापूर तालुक्यात यापूर्वी राजापूर शिपयार्ड या कंपनीकडून वाडा, वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली आहे. या शेतकऱ्यांनी सध्या या कंपनीविरोधात लढा पुकारला आहे. ही फसवणूक ताजी असतानाच आता कोलकातातील आयलॉग पोर्ट बंदर प्रकल्प कंपनीकडूनही अशाप्रकारे नाटे आंबोळगड किनाऱ्यावर वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची बाब पुढे आली आहे. या विरोधात आता या परिसरातील शेतकऱ्यांनीही संघटीतपणे लढा देण्याचा निर्धार केला आहे. याला राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जर अशाप्रकारे कोणतीही कंपनी तालुक्यात येऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणार असेल तर आम्ही ते कदापीही सहन करणार नाही, असे स्पष्ट करत ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे यशवंतराव यांनी स्पष्ट केले आहे. या कंपनीकडून शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाची देखील फसवणूक करण्यात आल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. (प्रतिनिधी) खोटी माहिती? : कंपनीचा अहवाल चुकीचा? या प्रकल्पस्थळापासून जवळपास २.५० कि. मी. क्षेत्रामध्ये मनुष्यवस्ती आणि घरे नाहीत असे अहवालात नमुद करण्यात आले असले तरी प्रकल्पक्षेत्राच्या जवळच १ ते १.५० कि. मी. परिसरात आंबोळगड हे गाव वसलेले आहे. दोन कि. मी. अंतरावर तिवरे तर पुढे वेत्ये ही गावे आहेत. शासनाकडून व पर्यावरण मंडळाकडून परवाना मिळवण्यासाठी कंपनीकडून खोटी माहिती देण्यात आली आहे. तसेच जैविक पर्यावरण अहवालामध्ये तर अभ्यास क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरात जंगले नाहीत असे नमुद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या परिसरात नाटे, पडवणे व वेत्ये गावातील अनेक शेतकऱ्यांच्या कलमाच्या बागा असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. गुन्हा दाखल करा कंपनी चुकीचा अहवाल तयार करून फसवणूक करत आहे. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले.