शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

बस अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली

By admin | Updated: May 16, 2014 00:28 IST

रत्नागिरी : पालीजवळील नागलेवाडीत बुधवारी ट्रकने बसला दिलेल्या टक्करमुळे झालेल्या अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली असून, हरिश्चंद्र धकटू कोटकर (४०, दाभोळे)

रत्नागिरी : पालीजवळील नागलेवाडीत बुधवारी ट्रकने बसला दिलेल्या टक्करमुळे झालेल्या अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली असून, हरिश्चंद्र धकटू कोटकर (४०, दाभोळे) असे या मृताचे नाव आहे. या अपघातात कोटकर यांच्यासह सुनीता शंकर गार्डी (५५, रा. देवळे) गायत्री दीपक भालेराव (१३, लोणार) व सुचिता चंद्रकांत शिवगण (नाणीज) हे मृत्युमुखी पडले होते. बुधवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास नागलेवाडी येथे गोव्याहून भरधाव येणार्‍या ट्रकने एस. टी.ला जोरदार धडक दिली होती. रत्नागिरी -कोल्हापूर बसचा चालकाच्या बाजूकडील भाग कापला गेला होता. या अपघातामुळे पालीपर्यंत व हातखंब्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक दीड तास विस्कळीत झाली होती. ट्रक व बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. घटनास्थळाचे चित्र हे काळजाचा थरकाप उडविणारे होते. ट्रकच्या ठोकरीनंतर बस पाठीमागे फेकली गेली. त्यामुळे पाठीमागून असणार्‍या स्कॉर्पिओ व स्वीफ्ट या गाड्यांवर बस जाऊन आदळली होती. परिणामी त्या दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले होते. सदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज नाणीज संस्थानच्या गाडीने मृत व जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. बसमधील गायत्री भालेराव ही १३ वर्षांची मुलगी अपघातात ठार झाली होती. ती बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने तिचे नातेवाईक आज रत्नागिरीत दाखल झाले. गायत्रीचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी टाहो फोडला. गायत्रीचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर आज रात्री तिच्या नातेवाईकांनी लोणार (जि. बुलडाणा) येथे हलविला. उद्या तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत, असे तिच्या रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)