शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

बस अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली

By admin | Updated: May 16, 2014 00:28 IST

रत्नागिरी : पालीजवळील नागलेवाडीत बुधवारी ट्रकने बसला दिलेल्या टक्करमुळे झालेल्या अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली असून, हरिश्चंद्र धकटू कोटकर (४०, दाभोळे)

रत्नागिरी : पालीजवळील नागलेवाडीत बुधवारी ट्रकने बसला दिलेल्या टक्करमुळे झालेल्या अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली असून, हरिश्चंद्र धकटू कोटकर (४०, दाभोळे) असे या मृताचे नाव आहे. या अपघातात कोटकर यांच्यासह सुनीता शंकर गार्डी (५५, रा. देवळे) गायत्री दीपक भालेराव (१३, लोणार) व सुचिता चंद्रकांत शिवगण (नाणीज) हे मृत्युमुखी पडले होते. बुधवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास नागलेवाडी येथे गोव्याहून भरधाव येणार्‍या ट्रकने एस. टी.ला जोरदार धडक दिली होती. रत्नागिरी -कोल्हापूर बसचा चालकाच्या बाजूकडील भाग कापला गेला होता. या अपघातामुळे पालीपर्यंत व हातखंब्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक दीड तास विस्कळीत झाली होती. ट्रक व बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. घटनास्थळाचे चित्र हे काळजाचा थरकाप उडविणारे होते. ट्रकच्या ठोकरीनंतर बस पाठीमागे फेकली गेली. त्यामुळे पाठीमागून असणार्‍या स्कॉर्पिओ व स्वीफ्ट या गाड्यांवर बस जाऊन आदळली होती. परिणामी त्या दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले होते. सदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज नाणीज संस्थानच्या गाडीने मृत व जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. बसमधील गायत्री भालेराव ही १३ वर्षांची मुलगी अपघातात ठार झाली होती. ती बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने तिचे नातेवाईक आज रत्नागिरीत दाखल झाले. गायत्रीचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी टाहो फोडला. गायत्रीचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर आज रात्री तिच्या नातेवाईकांनी लोणार (जि. बुलडाणा) येथे हलविला. उद्या तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत, असे तिच्या रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)