शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

गुहागर-रत्नागिरी मार्गावर होणार चार मोठे पूल

By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST

काम सुरु : ३ कोटी २९ लाखांचा खर्च अपेक्षित

शृंगारतळी : गुहागर येथून भातगावमार्गे रत्नागिरीला जाणाऱ्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या तीन कोटी २९ लाख रूपये निधीच्या पुलांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याशिवाय अन्य चार मोठ्या पुलांचे काम लवकरच सुरू होणार आहे. ही कामे झाल्यानंतर वाहनचालकांचा प्रवास सुखकर होणार आहे. दापोली, गुहागर येथील वाहनचालकांसाठी भातगावमार्गे रत्नागिरीला कमी वेळेत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गामुळे इंधन व वेळेची बचत होते. वाहनांची वर्दळ कमी असल्याने सुदैवाने अद्याप मोठा अपघात झालेला नाही. रस्ता ठिकठिकाणी वळणदार असल्याने वाहनचालकांना वाहने सावकाश चालवावी लागतात, त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर संपूर्ण रस्ता हिरवागार जंगलातून जात असल्याने निर्सगाचे विहंगम दर्र्शन पाहायला मिळते. तळीपासून बहुतेक ठिकाणी चांगला व रूंद रस्ता आहे. मात्र, आबलोली, काजुर्ली येथे काही ठिकाणी रस्ता बराच खराब झाला आहे, तो दुरूस्त होण्याची गरज असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. या मार्गावर तीन कोटी २९ लाख रूपये निधी खर्च करून ठेकेदारामार्फत तळी ते भातगावच्या दरम्यान या पुलांचे काम सुरू आहे. याव्यतिरिक्त काही ठिकाणी लहान पुलांची कामे करण्यात आली आहेत. अर्थातच दिवसेंदिवस हा मार्ग आता वाहनचालकांसाठी सुखकर बनत चालला आहे़ सध्या ज्या कामांची सुरूवात आहे, ती कामे दर्जेदार होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता, चिपळूण व उपविभाग, गुहागर येथील अधिकाऱ्यांनी आतापासूनच लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात या पुलाच्या निर्मितीमुळे अवजड वाहनांची वाहतूक होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. (वार्ताहर)-दापोली, गुहागर येथील वाहनचालकांसाठी भातगावमार्गे रत्नागिरीला कमी वेळेत जाण्याचा सुखकर मार्ग.-तीन कोटी २९ लाख रूपये निधी खर्च करून तळी ते भातगावच्या दरम्यान या पुलांचे काम सुरू.-काही ठिकाणी लहान पुलांची कामे करण्यात आली आहेत.