शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

राज्याच्या राजकारणात बळी राज सेना पक्षाचा उदय

By अरुण आडिवरेकर | Updated: April 22, 2023 19:06 IST

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थापना

रत्नागिरी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पक्षाची स्थापना केली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे शनिवारी (२२ एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बळी राज सेना पक्ष स्थापन करण्यात आला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी रिफायनरी विराेधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशाेक वालम यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.कुणबी समाजाेन्नती संघ, मुंबई संचालित कुणबी राजकीय संघटन समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर विसे हे हाेते. व्यासपीठावर कुणबी समाजाेन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, सरचिटणीस अरविंद डाफळे, उपाध्यक्ष सदानंद काष्टे, हरिश्चंद्र म्हातले, सहसचिव अशाेक करंजे, भास्कर चव्हाण, हरिश्चंद्र पाटील, अशाेक वालम, नंदकुमार माेहिते, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, संजय हंडाेरे, सुवर्णा पाटील, सुरेखा लाेखंडे, मनाेहर जाेशी, प्रकाश बांगरस, गिरीश माेंडे, उपस्थित हाेते.यावेळी माजी आमदार दिगंबर विसे म्हणाले की, हा पक्ष काेकणापुरता मर्यादीत असता कामा नये. देशातील नामांकित पक्ष असला पाहिजे. आज आपण दिवा लावला आहे ताे अक्षयपणे तेवत ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी उचलायची असेल तर सणासारखे वागून चालणार नाही, असे ते म्हणाले.पक्ष अध्यक्ष अशाेक वालम म्हणाले की, काेणतीही संघटना, पक्ष पुढे न्यायचा असेल तर महिलांचा वाटा माेठा पाहिजे. त्यांना संधी दिली पाहिजे. ती संधी या पक्षाच्या माध्यमातून मिळेल. अक्षय म्हणजे कधीही न तुटणारा म्हणून आजच्या दिवशी पक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी