शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नद्या स्वच्छतेला चळवळीचे रूप

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

सामाजिक संस्था पुढे : नेवरे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोहीम सुरू

रत्नागिरी : नदीपात्र सफाईसाठी सरकारवर अवलंबून न राहता लोकसहभागातून ही चळवळ उभी राहत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. संगमेश्वर, दापोली, मंडणगड, चिपळूणपाठोपाठ आता रत्नागिरी तालुक्यातही सामाजिक संस्था ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्र स्वच्छता मोहीम राबवत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथील महालक्ष्मी संकल्प प्रतिष्ठान, जायंट्स ग्रुप, जायंट्स ग्रुप आॅफ रत्नागिरी सीटी सहेली, जायंट्स ग्रुप आॅफ धामणसे आणि रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन या पाच संस्थांनी एकत्र येऊन सोमगंगा नदीपात्र स्वच्छता मोहिमेला नुकताच प्रारंभ केला आहे.सोमगंगा नदीचे पात्र सुमारे दोन किलोमीटरचे आहे. या पात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला असून, झाडेझुडुपे व कचरा साचलेला आहे. नदीपात्र खराब झाल्याने गावातील विहिरींचे पाणीही खराब होत चाललेले आहे. सध्या ही नदी कोरडी असल्याने गावातील विहिरींची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. याची झळ नेवरेवासीयांना बसत आहे. गेली कित्येक वर्षे नदी साफ न केल्याने दरवर्षी पूरस्थिती निर्माण होऊन गावातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरते. दरवर्षी पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी नेवरेतील महालक्ष्मी संकल्प प्रतिष्ठान, जायंट्स ग्रुप आॅफ नेवरे, जायंट्स ग्रुप आॅफ रत्नागिरी सिटी सहेली, जायंट्स ग्रुप आॅफ धामणसे आणि रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन या पाच सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन तेथील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सोमगंगा नदीपात्र स्वच्छतेची मोहिम हाती घेतली आहे. दोन किलोमीटर पात्रातील कचरा तसेच गाळ काढण्यासाठी होणारा खर्च या संस्था स्वत: करणार आहेत. नेवरे ग्रामपंचायतीकडून काही आर्थिक भार उचलला जाणार आहे.मोहिमेचा प्रारंभ गुरुवारी झाला. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी सुमारे ४० टक्के गाळ, कचरा हटवण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी शाम पाटील, नेवरेच्या सरपंच ऋतुजा गुरव, उपसरपंच रामचंद्र रसाळ, महालक्ष्मी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत हर्षे, जायंट्स ग्रुप आॅफ नेवरेचे अनिकेत कडमडकर, जायंट्स ग्रुप, जायंट्स ग्रुप आॅफ रत्नागिरी सिटी सहेलीच्या अध्यक्षा विद्या गर्दे, जायंट्स ग्रुप आॅफ धामणसे तसेच जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश गद्रे, पाचही संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज दुसऱ्या दिवशी दोन जेसीबी लावून काम सुरू होते. या मोहिमेचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी कौतुक केले. आता अनेक गावांमधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही संस्था नदीपात्र स्वच्छतेच्या मोहिमेत पुढाकार घेऊ लागल्या आहेत. शासनाच्या नदी पुनरूज्जीवन मोहिमेला त्यामुळे गती मिळत आहे. लोकसहभागातून संगमेश्वर, दापोली, मंडणगड, चिपळूण तालुक्यातील नद्यांमधील गाळ काढण्याच्या मोहिमेला याआधीच प्रारंभ झाला आहे. (प्रतिनिधी)एक्सव्हेटर यंत्र : खडपोलीतील तलावाची क्षमता वाढणारचिपळूण तालुक्यातील खडपोली येथे जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी खरेदी केलेल्या एक्सव्हेटर यंत्रसामग्री लोकार्पण सोहळा आणि जलयुक्तशिवार योजनेतून शिवकालीन तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. खडपोली येथील शिवकालीन तलावाचा गाळ काढल्यानंतर तलावाची क्षमता ६२० दशलक्ष लीटरवरुन एक हजार ७७० दशलक्ष लीटरपर्यंत वाढणार आहे. शिवाय तलावाच्या परिसरातील विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळीसुद्धा वाढणार आहे.पातळी वाढण्यासाठी प्रयत्नपाणीटंचाईला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजनांसह भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठीही राज्य शासनाकडून भर देण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत बळकट करुन कायमस्वरुपी पाणीसाठा निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, बोअरवेल खोदण्यासह टंचाईची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी विहीर खोदाईच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.