शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग केवळ २० टक्केच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

By शोभना कांबळे | Updated: September 6, 2023 19:25 IST

गावागावांमध्ये कॅम्प घेणार 

रत्नागिरी : मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग हवा तेवढा नाही. ८० ते ८५ टक्के मतदारांचे नाव मतदार यादीतच नाही, ही सशक्त लोकशाही होण्यासाठी चिंताजनक बाब आहे, असे मत रत्नागिरी दाैऱ्यावर आलेले राज्याचे अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले. तसेच लोकशाही प्रबळ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांची संख्या वाढणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. आज, बुधवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण २०२४ कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे रत्नागिरीत आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्याच्या आढावा घेतला. या कार्यक्रमाची तसेच मतदार जनजागृती याविषयी निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, परिविक्षाधीन अधिकारी डाॅ. जस्मीन उपस्थित होते. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही उदासीनता असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. हे मतदार वाढण्यासाठी केवळ आयोगाचे नव्हे तर सर्व राजकीय पक्षांकडून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.गावागावांमध्ये कॅम्प घेणार मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण २०२४ कार्यक्रमाविषयी माहिती देताना देशपांडे म्हणाले की, हे निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा तयार असाव्यात यासाठी महाराष्ट्रभर जिल्हा निहाय आढावा आयोगाकडून घेतला जात आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याचा हेतू या याद्या निर्दोष करणे तसेच नवमतदारांना समाविष्ट करणे हा आहे. लोकशाही प्रबळ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधीक मतदारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. सध्या या प्रक्रियेत १८ -१९ वयोगटातील नवमतदारांची संख्या अतिशय अल्प दिसते. मतदार वाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून शाळा - महाविद्यालये तसेच गावागावांमध्ये कॅम्प घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकVotingमतदान