शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अन्न प्रक्रिया उद्याेग याेजना देणार फळप्रक्रिया उद्याेगांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यातील फळप्रक्रिया उद्योगांना गती देण्यासाठी कृषी समूह गटांसाठी फळप्रक्रिया उद्योग ...

रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यातील फळप्रक्रिया उद्योगांना गती देण्यासाठी कृषी समूह गटांसाठी फळप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सहकार्य केले जाणार आहे.

केंद्राची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२१-२२ ते २०२४-२५ अखेर पाच वर्षे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील फळप्रक्रिया उद्योगांना गती देण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबवली जाणार आहे. वैयक्तिक लाभार्थी, बचतगट, शेतकरी कंपनी यांना याचा लाभ घेता येणार आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी, उद्योगस्तरवृध्दी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो. नवीन उद्योग असल्यास आंबा प्रक्रियेसाठी तर जुना उद्योग असल्यास आंबा, काजू, फणस, कोकम, खाद्यपदार्थ, पिठे, मसाले उद्योग, मांस प्रक्रिया, दूध प्रक्रिया यासाठी योजनेचा लाभ घेता येणार आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, पासिंग प्रमाणपत्र, राहत्या घराचे वीजबिल, बँक पासबुक मागील सहा महिन्यांची छायाप्रत, उद्योग ज्या जागेत करणार त्याचा घरपत्रक उतारा, भाडे करारपत्र, मशिनरी कोटेशन्स, नवीन बांधकाम करणार असल्यास ७/१२, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक या कागदपत्रांद्वारे या योजनेत सहभागी होता येणार आहे.

बचत गटांसाठी बचतगट स्थापनेवेळचा ठराव, बँक पासबुक छायाप्रत, सर्व सदस्यांचे आधारकार्ड, असल्यास पॅनकार्ड, सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकारातील फोटो, कोटेशन, जागेचा भाडेकरार, उद्योग ज्या जागेत करणार त्याचा घरपत्रक उतारा, मशिनरी कोटेशन्स, कर्ज काढण्यासाठीचा गटाचा ठराव ही कागदपत्रे दिल्यावर योजनेचा लाभ मिळणार आहे. वैयक्तिक लाभासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करावेत. शेतकरी कंपनी, बचत गटांनी तालुका कृषी अधिकारी किंवा व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

------------------------

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ धोरणानुसार जिल्हास्तरावर वैयक्तिक उद्योजक आणि विविध गटांचे सदस्य, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, संस्था आणि सहकारी उत्पादकांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी