शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जिल्ह्यातील मुलींचा प्रथमच राज्यात झेंडा

By admin | Updated: October 16, 2015 22:48 IST

राज्यस्तरीय खो - खो स्पर्धा : पंधरा वर्षानंतर रत्नागिरीला उपविजेतेपद

रत्नागिरी : राज्य खो-खो असोसिएशन आणि सातारा जिल्हा अ‍ॅमेच्युअर खो - खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण (जि. सातारा) येथे झालेल्या राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेत रत्नागिरीच्या संघाने प्रथमच अंतिम सामन्यात प्रवेश केला. ठाण्याबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात त्यांना चार गुणांनी पराभव पत्कारावा लागला. गेल्या पंधरा वर्षात प्रथमच जिल्ह्यातील मुलींनी राज्यात रत्नागिरीचा झेंडा फडकवला आहे.महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याचा संघ राष्ट्रीय खेळाडूंनी भरलेला होता. तर दुसरीकडे रत्नागिरीच्या संघात ऐश्वर्या सावंत, आरती कांबळे, अपेक्षा सुतार, श्रध्दा लाड यांचा समावेश होता. अंतिम सामना चुरशीचा झाला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतने २.३० मि., ३.२० मि. आणि आरती कांबळेने १.३० मि., १.५० मि. खेळ करत ठाण्याच्या संघाला जेरीस आणले. श्रध्दा लाडने उत्कृष्ट खांब मारत दोन गडी टिपले. ठाण्याच्या बलाढ्य संघाला अंतिम सामन्यात विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र, ठाण्याच्या अनुभवी संघापुढे रत्नागिरीच्या मुलींना पराभव पत्करावा लागला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतला सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरवण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही बलाढ्य उस्मानाबाद संघाला रत्नागिरीने १ गुण व २ मिनिटे राखून पराभूत केले. रत्नागिरीने नाणेफेक जिंकून संरक्षण घेतले. मध्यंतराला रत्नागिरीकडे ३ गुणांची आघाडी होती. ऐश्वर्या सावंतने २ मि. व २.१० मि. खेळ, आरती कांबळेने २.३० मि., १.४० मि., तन्वी कांबळेने २.३० मि. नाबाद आणि ०.३० मि. आणि दोन गडी बाद केले. तर अपेक्षा सुतारने २ मि., १.१० मि. आणि श्रध्दा लाडने १.३० व ३ गडी बाद केले. त्यांच्या आक्रमक खेळामुळे हा सामना रत्नागिरीने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्य असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी संघाला संदीप तावडे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय खेळाडू पंकज चवंडे हे या संघाचे प्रशिक्षक असून, विनोद मयेकर व्यवस्थापक आहेत. या विजयानंतर रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी माजी आमदार बाळ माने, प्रसन्न आंबुलकर, असोसिएशनचे अध्यक्ष नाना मयेकर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, बाळा मयेकर, समीर काबदुले, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)गेली पंचवीस वर्षे विवेक पंडित, कै. दिगंबर नाचणकर आणि मी खो-खोची मुहूर्तमेढ रोवली. त्याला असंख्य लोकांचे हातभार लागले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हा खेळ टिकवून ठेवण्याची धडपड होती. सुरवातीला एकतरी राष्ट्रीय खेळाडू झाला पाहिजे, अशी इच्छा होती. मात्र, गेल्या पंधरा वर्षात असंख्य राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. मात्र, संघ म्हणून जिंकण्याची इच्छा फलटण येथील राज्य स्पर्धेतील अंतिम सामन्यातील भरारीतून पूर्ण झाली. अशीच घौडदौड कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिल, अशी प्रतिक्रिया राज्य खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सचिव संदीप तावडे यांनी व्यक्त केली.