शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

जिल्ह्यातील मुलींचा प्रथमच राज्यात झेंडा

By admin | Updated: October 16, 2015 22:48 IST

राज्यस्तरीय खो - खो स्पर्धा : पंधरा वर्षानंतर रत्नागिरीला उपविजेतेपद

रत्नागिरी : राज्य खो-खो असोसिएशन आणि सातारा जिल्हा अ‍ॅमेच्युअर खो - खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण (जि. सातारा) येथे झालेल्या राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेत रत्नागिरीच्या संघाने प्रथमच अंतिम सामन्यात प्रवेश केला. ठाण्याबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात त्यांना चार गुणांनी पराभव पत्कारावा लागला. गेल्या पंधरा वर्षात प्रथमच जिल्ह्यातील मुलींनी राज्यात रत्नागिरीचा झेंडा फडकवला आहे.महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याचा संघ राष्ट्रीय खेळाडूंनी भरलेला होता. तर दुसरीकडे रत्नागिरीच्या संघात ऐश्वर्या सावंत, आरती कांबळे, अपेक्षा सुतार, श्रध्दा लाड यांचा समावेश होता. अंतिम सामना चुरशीचा झाला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतने २.३० मि., ३.२० मि. आणि आरती कांबळेने १.३० मि., १.५० मि. खेळ करत ठाण्याच्या संघाला जेरीस आणले. श्रध्दा लाडने उत्कृष्ट खांब मारत दोन गडी टिपले. ठाण्याच्या बलाढ्य संघाला अंतिम सामन्यात विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र, ठाण्याच्या अनुभवी संघापुढे रत्नागिरीच्या मुलींना पराभव पत्करावा लागला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतला सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरवण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही बलाढ्य उस्मानाबाद संघाला रत्नागिरीने १ गुण व २ मिनिटे राखून पराभूत केले. रत्नागिरीने नाणेफेक जिंकून संरक्षण घेतले. मध्यंतराला रत्नागिरीकडे ३ गुणांची आघाडी होती. ऐश्वर्या सावंतने २ मि. व २.१० मि. खेळ, आरती कांबळेने २.३० मि., १.४० मि., तन्वी कांबळेने २.३० मि. नाबाद आणि ०.३० मि. आणि दोन गडी बाद केले. तर अपेक्षा सुतारने २ मि., १.१० मि. आणि श्रध्दा लाडने १.३० व ३ गडी बाद केले. त्यांच्या आक्रमक खेळामुळे हा सामना रत्नागिरीने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्य असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी संघाला संदीप तावडे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय खेळाडू पंकज चवंडे हे या संघाचे प्रशिक्षक असून, विनोद मयेकर व्यवस्थापक आहेत. या विजयानंतर रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी माजी आमदार बाळ माने, प्रसन्न आंबुलकर, असोसिएशनचे अध्यक्ष नाना मयेकर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, बाळा मयेकर, समीर काबदुले, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)गेली पंचवीस वर्षे विवेक पंडित, कै. दिगंबर नाचणकर आणि मी खो-खोची मुहूर्तमेढ रोवली. त्याला असंख्य लोकांचे हातभार लागले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हा खेळ टिकवून ठेवण्याची धडपड होती. सुरवातीला एकतरी राष्ट्रीय खेळाडू झाला पाहिजे, अशी इच्छा होती. मात्र, गेल्या पंधरा वर्षात असंख्य राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. मात्र, संघ म्हणून जिंकण्याची इच्छा फलटण येथील राज्य स्पर्धेतील अंतिम सामन्यातील भरारीतून पूर्ण झाली. अशीच घौडदौड कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिल, अशी प्रतिक्रिया राज्य खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सचिव संदीप तावडे यांनी व्यक्त केली.