शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

चिपळूणमधील पाच गाव

By admin | Updated: February 15, 2015 23:41 IST

जलयुक्त शिवार अभियान : प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठके

चिपळूण : तालुक्याक्यातील पाण्याचा प्रश्न सुटावा, टंचाई दूर व्हावी, यासाठी शासनाच्या नवीन धोरणानुसार जलयुक्त शिवार अभियान ही योजना केतकी, कात्रोळी, गाणे, अनारी व कोसबी या गावांमध्ये राबवण्याचा निर्धार उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लहरी हवामानमुळे आजकाल वेळी अवेळी पाऊस पडतो. पिकाच्या ऐन वाढीच्या हंगामात पाऊस गुंगारा देत असल्याने पिकावर त्याचा परिणाम होतो. पावसाची अनियमितता व खंड यामुळे टंचाई निर्माण होते. ही परिस्थिती दूर करण्यासाठी शासनाने सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ जलयुक्त शिवार अभियान ही योजना आणली . चिपळूण तालुक्यात उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष हजारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी समितीचे सचिव तथा तालुका कृषी अधिकारी आर. वाय. पवार सर्व खात्यांचे अधिकारी, सरपंच उपस्थित होते. पवार यांनी योजनेचे महत्त्व, कार्यपद्धती समजावून सांगितल्यावर तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली.केतकी, कात्रोळी, गाणे, कोसबी, अनारी या निवड झालेल्या गावांमध्ये शिवार फेरी व ग्रामसभा घेऊन कृषी विभागासह इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कृती आराखडा तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या. पाणी टंचाई दूर करुन ही गावे टंचाईमुक्त होण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. केतकी, कात्रोळी, गाणे, कोसबी, अनारी या गावांची झालेली निवड ही तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानाला प्रेरणा देणारी ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)