शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

पाच शेतकऱ्यांच्या बागा जळून खाक

By admin | Updated: December 30, 2015 00:45 IST

लांजा तालुक्यातील घटना : येरवंडे येथे वणव्यात गवताच्या वरंडी जळल्या; लाखोंचे नुकसान

लांजा : तालुक्यातील येरवंडे येथे लागलेल्या वणव्यात येथील गरीब ५ शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागांसह गवताच्या वरंडी व गवत जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ५ शेतकऱ्यांच्या हाता - तोंडाशी आलेला घास या वणव्याने हिरावून घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.येरवंडे येथील अंकुश गणपत सावंत यांची हापूस आंब्याची १५० झाडे, काजूची झाडे २५० आणि गवताच्या ३०० वरंडी जळून गेल्या. तसेच संदीप गंगाराम दळवी यांची हापूसची ३० झाडे, काजूची ४० झाडे, गवत, यशवंत सावंत यांची हापूसची १५० झाडे, काजूची २०० झाडे व गवत, सुरेश सावंत यांची हापूसची २०० झाडे, काजूची २५० झाडे, गवत, संतोष दत्ताराम दळवी यांची हापूची २०० झाडे, काजूची १५० झाडे व गवत जळू खाक झाले आहे. या बागांमध्ये सुकलेले गवत असल्याने दुपारच्या वेळेत गवताने पेट घेतल्याने शेतकऱ्यांना वणवा आटोक्यात आणणे अशक्य झाले. लहान मुलासमान वाढवलेली आंबा, काजूची बाग डोळ्यासमोर जळून खाक होताना दु:ख वाटत होते.अथक प्रयत्न केल्यावर हा वणवा विझवण्यात यश आले. यामुळेच आजूबाजूला असणाऱ्या आंबा, काजूच्या बागा या वणव्यातून बचावल्या आहेत. मात्र, या ५ गरीब शेतकऱ्यांच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने १० लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऐन हंगामात आंबा, काजू बागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. (प्रतिनिधी)नुकसान : सुकलेल्या गवताचा परिणामरस्त्याच्या कडेला सुकलेले गवत मोठ्या प्रमाणात असते. हे गवत वेळच्या वेळी न काढल्याने वणव्याचे प्रकार घडतात. रस्त्याच्या कडेलाच बागा असल्यास हे गवत पेटून बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. गाडीतून जाताना सहजपणे पेटलेली सिगारेट किंवा काडी टाकण्याची सवय एखाद्याला असते. त्यामुळे वणव्याचे प्रकार घडत आहेत.वणवा रोखाकोकणात वणवे लागण्याचे प्रमाण अधिक आहे. सुकलेल्या गवताने पेट घेतल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे हे वणवे रोखणे गरजेचे आहे.