शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 11:38 IST

मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे.

रत्नागिरी : एका मागून एक आलेल्या वादळांची श्रृंखला आणि वादळी वाऱ्यामुळे मासेमारी हंगाम सुरू हाेऊनही मच्छिमारांच्या जाळ्यात फारसे काही पडलेले नाही. जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला असतानाच रविवारी सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक नाैका बंदरातच उभ्या हाेत्या.

मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर वादळाची मालिका सुरुच आहे. वादळांसह अवकाळी कोसळणाऱ्या पावसाने तसेच मतलई वाऱ्यांमुळे मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निर्यातक्षम मासे मिळत नसून कमी प्रतीच्या माशांची मरतूक होत असल्याने मच्छिमारांना खलाशी, डिझेलचाही खर्च भागवता येत नाही.

या हंगामात चांगले मासे मिळतील अशा आशेवर असलेल्या मच्छिमारांना पुन्हा रिकाम्या हाताने किनाऱ्यावर थांबावे लागत आहे. चालू मासेमारी हंगामात वादळ, वाऱ्यांमुळे सुमारे १५ ते २० वेळा मासेमारी बंद ठेवावी लागली होती. कोरोना संक्रमणापासून मासेमारीत काही ना काही व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढत असल्याने मच्छिमार संकटात सापडला आहे.

निम्मे उत्पन्नही नाही

जिल्ह्यात ३,०७७ यांत्रिकी नौका आणि ४४२ बिगर यांत्रिकी नौका अशा एकूण ३,५१९ नौका आहेत. मागील ७ वर्षात माशांच्या उत्पादनात घट होऊन सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ते निम्म्यावर म्हणजेच ६५,३७४ मेट्रीक टनावर आले होते. मात्र, चालू हंगामात सततच्या वादळ-वाऱ्यांमुळे आतापर्यंत माशांचे निम्मेही उत्पन्न मच्छिमारांना मिळालेले नाही

मच्छिमारांची स्थिती फार बिकट आहे. डिझेलचे दर वाढले त्यातच मासे मिळत नाही. त्यामुळे डिझेलचा तसेच खलाशांचाही खर्चही भागत नाही. त्यातच साडेतीन वर्षाचा डिझेलचा परतावा मिळालेला नाही. परताव्याची रक्कम शासनाने वेळीच दिल्यास त्या रक्कमेतून मच्छिमारांना काही खर्च भागवता येईल.- निसार दर्वे, मच्छिमार नेते, मिरकरवाडा

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार