शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 11:38 IST

मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे.

रत्नागिरी : एका मागून एक आलेल्या वादळांची श्रृंखला आणि वादळी वाऱ्यामुळे मासेमारी हंगाम सुरू हाेऊनही मच्छिमारांच्या जाळ्यात फारसे काही पडलेले नाही. जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला असतानाच रविवारी सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक नाैका बंदरातच उभ्या हाेत्या.

मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर वादळाची मालिका सुरुच आहे. वादळांसह अवकाळी कोसळणाऱ्या पावसाने तसेच मतलई वाऱ्यांमुळे मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निर्यातक्षम मासे मिळत नसून कमी प्रतीच्या माशांची मरतूक होत असल्याने मच्छिमारांना खलाशी, डिझेलचाही खर्च भागवता येत नाही.

या हंगामात चांगले मासे मिळतील अशा आशेवर असलेल्या मच्छिमारांना पुन्हा रिकाम्या हाताने किनाऱ्यावर थांबावे लागत आहे. चालू मासेमारी हंगामात वादळ, वाऱ्यांमुळे सुमारे १५ ते २० वेळा मासेमारी बंद ठेवावी लागली होती. कोरोना संक्रमणापासून मासेमारीत काही ना काही व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढत असल्याने मच्छिमार संकटात सापडला आहे.

निम्मे उत्पन्नही नाही

जिल्ह्यात ३,०७७ यांत्रिकी नौका आणि ४४२ बिगर यांत्रिकी नौका अशा एकूण ३,५१९ नौका आहेत. मागील ७ वर्षात माशांच्या उत्पादनात घट होऊन सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ते निम्म्यावर म्हणजेच ६५,३७४ मेट्रीक टनावर आले होते. मात्र, चालू हंगामात सततच्या वादळ-वाऱ्यांमुळे आतापर्यंत माशांचे निम्मेही उत्पन्न मच्छिमारांना मिळालेले नाही

मच्छिमारांची स्थिती फार बिकट आहे. डिझेलचे दर वाढले त्यातच मासे मिळत नाही. त्यामुळे डिझेलचा तसेच खलाशांचाही खर्चही भागत नाही. त्यातच साडेतीन वर्षाचा डिझेलचा परतावा मिळालेला नाही. परताव्याची रक्कम शासनाने वेळीच दिल्यास त्या रक्कमेतून मच्छिमारांना काही खर्च भागवता येईल.- निसार दर्वे, मच्छिमार नेते, मिरकरवाडा

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार