शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

मच्छीमारी नौकांना दंड!

By admin | Updated: June 23, 2016 01:26 IST

बंदी आदेश मोडला : खटल्यांची सुनावणी लवकरच...

रत्नागिरी : पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा आदेश डावलून मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या वरवडे येथील ४० नौकांवर सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अन्वये रत्नागिरीच्या तहसीलदारांनी मंगळवारी रात्री खटले दाखल केले आहेत. या खटल्यांची सुनावणी येत्या काही दिवसात तहसीलदारांसमोर होणार आहे. ज्या नौकांवर जेवढ्या किंमतीचे मासे सापडले त्याच्या चार ते पाचपट दंड ठोेठावला जाऊ शकतो. तर मासे नसलेल्या नौकांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४० नौकांसाठी मिळून २ लाखांच्यावर दंड वसुली होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.१० जूनपासून सागरी मासेमारीला शासनाने पावसाळ्यात बंदी घातली आहे. मात्र, या कालावधीतही सागरी मासेमारीला काही नौका जात असल्याच्या तक्रारी मत्स्य व्यवसाय खात्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत रत्नागिरीचे विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्त एम. व्ही. भादुले यांनी त्यांच्या सहकारी अधिकारी व सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने तालुक्यातील वरवडे येथे सागरी मासेमारीला गेलेल्या ४० नौकांवर कारवाई केली होती. या नौका पकडल्यानंतर त्यावरील १६ हजारांचे मासेही जप्त करण्यात आले होते. या कारवाईमुळे खोल समुद्रात बंदीच्या काळातही चोरून मच्छीमारी केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यानंतर मंगळवारी रात्री या सर्व नौका मालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. बंदी आदेश मोडून मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई झाल्याने सागरात छुपेपणाने मासेमारी करण्यास जाणारे अन्य भागातील नौकामालकही धास्तावले आहेत. मात्र मिरकरवाडा व अन्य काही ठिकाणच्या मच्छीमारी नौका छुपी मासेमारी करतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)नौका मच्छीमारांच्या ताब्यात..कारवाईअंतर्गत पकडण्यात आलेल्या ४० मच्छीमारी नौका पुन्हा संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मत्स्य व्यवसाय खात्याकडे या नौका ठेवण्याची व्यवस्था नसल्याने नौकांचा ताबा मच्छीमारांना देण्यात आला आहे. याबाबत विचारता सहाय्यक मत्स्य आयुक्त एम्. व्ही. भादुले यांनी सांगितले की, ही कारवाई आता सुरूच राहणार आहे. दंडात्मक कारवाई केलेल्या नौका पुन्हा मासेमारीस गेल्या तर त्यांच्यावर पुन्हा खटले दाखल होतील. त्यानंतरही मासेमारीसाठी संबंधित नौका गेल्यास त्यांचे परवाने रद्द होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.