शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

मत्स्योद्योग शाळेची इमारत खिळखिळी

By admin | Updated: May 20, 2016 22:45 IST

शिक्षणाचे भिजत धडे : शाळेच्या दुरवस्थेकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष...!

रत्नागिरी : राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याचे दिवसांमध्ये शाळेत गळतीचे प्रमाण मोठे असल्याने विद्यार्थ्यांना भिजत शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात. शाळेच्या या दुरवस्थेकडे कोणीही लक्ष देत नसल्याने ही शाळा जिल्हा परिषद किंवा मत्स्य विभाग यापैकी कोण चालवते, हा प्रश्न पालकांना सतावत आहे.जिल्ह्यात रत्नागिरी शहरातील राजिवडा आणि राजापूर तालुक्यातील साखरीनाटे या दोन शाळा मत्स्योद्योग विभागाच्या अखत्यारीत आहेत. या दोन्ही शाळांमध्ये बहुतांशी मच्छीमारांची मुले शिकत असून, त्यांच्यासाठी मासेमारीशी संबंधित मत्स्योद्योग आणि सुतारकाम हे इतर शाळांपेक्षा वेगळे विषय येथे शिकवले जातात. या शाळेतील विद्यार्थ्यांना हे संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात येते. यासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके ही शासनाकडून देण्यात येतात. मात्र, तीन वर्षांपूर्वी या दोन्ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्या. तेव्हापासून या शाळेतील शिक्षकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्यापासून शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याची ओरड सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन एप्रिल महिन्यामध्ये झाले. मात्र, या मत्स्योद्योग शाळांमधील शिक्षकांना मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यांचे वेतन मिळण्यासाठी मे महिन्यापर्यंत वाट पहावी लागली. यामुळे शाळेतील शिक्षकवर्ग अडचणीत आला आहे. यापैकी राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या शाळेच्या छप्पराची कौले फुटली आहेत तसेच छप्पराचे लाकडी वासेही मोडकळीला आले आहेत. या शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले. मात्र, शाळेची जागा, इमारत अद्यापही जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळा दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडून झटकण्यात येते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये छपरातून गळती लागते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके, वह्या भिजून शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे राजीवडा येथील ही शाळा शासनाच्या मत्स्योद्योग खात्याकडे आहे की, जिल्हा परिषदेकडे, हा प्रश्न येथील रहिवाशांसह पालकांनाही सतावत आहे. मत्स्योद्योग खाते आणि जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा फटका शिक्षक व विद्यार्थ्यांना बसत आहे. (शहर वार्ताहर)साखरीनाटेतील शाळाही जिल्हा परिषदेकडे : राजिवड्यातील दुरुस्तीसाठी टाळाटाळ का? राजिवडा शाळेची इमारत व जमीन जिल्हा परिषदेच्या नावे नाही. त्यामुळे शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करता येत नसल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे. मत्स्योद्योग खात्याची राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील प्राथमिक शाळाही जिल्हा परिषदेकडे आहे. या शाळेच्या दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या खर्चातून करण्यात आले आहे. मात्र, राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषदेकडून टाळाटाळ केली जात आहे. साखरीनाटेच्या शाळेची इमारत व जमीन नावे नसताना जिल्हा परिषदेने तिची दुरुस्ती कशी केली? असा प्रश्न पालकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे.राजिवडा शाळेच्या छप्पराची कौले फुटलेली असल्याने पावसाचे पाणी वर्गात झिरपून विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तके भिजतात. त्यासाठी गेल्या वर्षी एका वर्गखोलीची कौले शिक्षक, विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करुन बदलली. मात्र, अन्य वर्गखोल्यांची कौले अजूनही फुटलेलीच आहेत. ती न बदलल्यास पावसाच्या पाण्यामध्येच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागणार आहेत.