शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीचा मार्ग बनला धोकादायक

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

मांडवी बंदर : भाट्ये खाडीमुखाशी गाळ

रत्नागिरी : शहरालगत भाट्ये खाडीमुखाशी असलेल्या मांडवी बंदरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून गाळ साचल्याने मासेमारीचा मार्गच धोकादायक बनला असून, मच्छीमार अडचणीत आले आहेत.भाट्ये खाडीकिनारी वसलेल्या राजिवडा, भाट्ये, कर्ला, फणसोप आणि जुवे या परिसरातील मासेमारी नौकांना खोेल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. मांडवी बंदरातून मच्छीमारांना जीव मुठीत धरुनच खोल समुद्रात जावे लागते. अनेक वर्षांपासून मांडवी बंदरातील गाळ उपसण्याबाबत राजिवडा, भाट्ये, कर्ला व अन्य गावांमधील मच्छीमारांकडून मत्स्य खात्याकडे सातत्याने मागणी करण्यात आली आहे. सातत्याने याबाबत मत्स्य खात्याला निवेदन देऊन बंदरातील गाळ उपसण्याबाबत साकडे घातले जाते. मात्र, अद्यापही शासनाला बंदरातील गाळ उपशासाठी मुहूर्त मिळालेला नाही. निवडणुका आल्या की मांडवी बंदरातील गाळ उपशाबाबत सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी, नेते व उमेदवार आश्वासने देतात. मात्र, ते आश्वासन निवडणुकीनंतर हवेत विरते. त्यामुळे नाईलाजास्तव मच्छीमारांना मृत्यूचा सापळा बनलेल्या मांडवी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी जावे लागते. (शहर वार्ताहर)नौका उलटली : गाळाचा प्रश्न ‘जैस थे’भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरामध्ये गाळ साचल्याने अनेकदा नौका उलटून बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काही मच्छीमारांना जीवही गमवावा लागल्याने त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरीही शासनाकडून या बंदरातील गाळाच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.