शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

जिल्ह्यात पाण्याचा पहिला टॅँकर लांजात

By admin | Updated: March 18, 2016 23:39 IST

धावडेवाडी : गतवर्षीपेक्षा चार दिवस उशिराने पोहोचली झळ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला हळूहळू पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. लांजा तालुक्यामध्ये पाणीटंचाई सुरु झाली असून, येथील पालू, चिंचुर्टी गावातील धावडेवाडीमध्ये आज (शुक्रवारी) प्रशासनाचा जिल्ह्यातील पहिला टँकर धावला. दरवर्षी खेडमध्ये धावणारा पहिला पाण्याचा टॅँकर यावर्षी लांजा तालुक्यात धावला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते़ येथील लोकांना सोडाच जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत़ जिल्ह्यात आत्तापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे.गतवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खेड तालुक्यातील खवटी येथील धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात शासनाकडून या वाडीला १४ मार्चपासून टँकरने पाणी पुरवठा करण्यास प्रारंभ झाला होता़ जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवते. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे़ मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे़मागील वर्षी पावसाळ्यानंतर २ आॅक्टोबरपासून जिल्हा परिषद कृषी विभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या तत्वावर श्रमदानातून बंधारे उभारण्यास सुरुवात केली होती. यामध्ये वनराई, कच्चे बंधारे यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त बंधारे उभारण्यात आल्याने त्याचा फायदा पाणीटंचाई दूर करण्यासाठी झाला. कारण गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाई सुरु होण्याची शक्यता होती. मात्र, बंधारे बांधल्यामुळे ग्रामीण भागातील विहिरी, तलाव, विंधन विहिरींतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने त्याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी खवटी धनगरवाडीमध्ये जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर धावला होता. यंदा लांजा तालुक्यातील पालू व चिंचुर्टी गावांमधील धावडेवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. धावडेवाडी ही लांजापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसली आहे. ही माचाळ या अतिउंच डोंगराळ गावाच्या जवळपास आहे. यंदा गतवर्षीपेक्षा ४ दिवस उशिरा जिल्ह्यात पाण्याचा पहिला टँकर धावला. टंचाईग्रस्त गावांसाठीचा यावर्षीचा पहिला टँकर पालू, चिंचुर्टी गावातील धावडेवाडी येथे धावला आहे. (शहर वार्ताहर)दरवर्षी खेडात टॅँकर : मार्च महिन्यातच टंचाईला सुरूवातगतवर्षी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये खवटी गावातील धनगरवाडीमध्ये पाणीटंचाई उद्भवल्याने पाण्याचा पहिला टँकर धावला होता. दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लांजा तालुक्यात पाणीटंचाईला प्रारंभ होतो. मात्र, यंदा मार्च महिन्यातच पाणीटंचाईची झळ पोहचली आहे.ग्रामीण भागातील डोंगरकपारीतील धनगरवाड्यांमध्ये पाणीटंचाई कायम.जिल्हा परिषदेंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे टंचाई दूर.मिशन बंधारेयावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईची झळ बसणार हे निश्चित झाले होते. ही पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत वनराई बंधारे मोहीम हाती घेण्यात आली होती. यामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईची झळ अद्याप बसलेली नसल्याचे दिसत आहे.