शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ‘समाजकल्याण’ची मंडणगडात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 15:50 IST

या सभेत आंबडवे येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यात आले. प्रथमच या गावात ही सभा घेण्यात आल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.

अरुण आडिवरेकररत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच समाजकल्याण विभागाची सभा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे घेण्यात आली. या सभेत आंबडवे येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यात आले. प्रथमच या गावात ही सभा घेण्यात आल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.

समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून ही सभा आंबडवे (ता. मंडणगड) येथे घेण्यात आली. जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून समाजकल्याण विभागाची सभा आंबडवे येथे घेण्यात आलेली नाही. आंबडवे या पवित्रस्थळी देशभरातूनच नवे तर देशाबाहेरीलही मंडळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यांना होणाऱ्या गैरसोयीबाबत येथील ग्रामस्थांनी कदम यांच्याशी चर्चा केली होती. त्याअनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. या सभेला समिती सदस्य माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी बांधकाम सभापती विनोद झगडे यांच्यासह पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, सर्व सदस्य उपस्थित हाेते.

समाजकल्याण समिती असूनही या समितीची आजवर आंबडवे येथे सभा झालेली नाही. ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांचे मूळगाव आपल्या जिल्ह्यात असूनही जिल्हा परिषदेच्या इतिहासात सभा झालेली नाही. त्यामुळेच ही सभा तेथे घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. - परशुराम कदम, सभापती, समाजकल्याण समिती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी