शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पहिला टप्पा निर्धोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2015 00:28 IST

जिल्हा परिषद : आरोग्य विभागाचा सुस्कारा

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाळा सुरु झाला असला तरी दूषित पाण्यामुळे साथींच्या आजारांचा कुठेही उद्रेक न झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यावेळी सुटकेचा श्वास घेतला आहे. तरीही पावसाळ्यात साथ उद्रेक होण्याच्या शक्यतेने जिल्ह्यातील ९१ गावांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. त्यासाठी जिल्ह्यात आरोग्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नैसर्गिक आपत्ती व पूरस्थितीमध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने पाऊस सुरु होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आखली होती. सन २०१३मध्ये पावसाळ्यात रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा, दापोली तालुक्यातील जालगाव आणि तेरेवायंगणी येथे तापाचे रुग्ण आढळून आले होते. त्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर ते डेंग्यूचे रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी या गावांमध्ये आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली होती. मात्र, सन २०१४च्या पावसाळ्यात जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळलेले नाहीत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.डेंग्यू, चिकुनगुन्या, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, तापसरीचा उद्रेक, हिवताप, काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा उद्रेक झालेल्या गावांबाबत आरोग्य विभागाने सतर्कता बाळगली आहे. या गावांवर आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पावसाळ्यासाठी संभाव्य पूरग्रस्त भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच या गावांना आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षक वेळोवेळी भेटी देऊन नियमित रोगविषयक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे पुरेसा औषधसाठा ठेवण्यात आला आहे. घरोघरी मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला पावसाच्या पाण्याबरोबर वर्षभराची घाण विहिरी, तलाव आदींमध्ये वाहून गेल्याने तेथील पाणी दूषित होते. पावसाचे पाणी तसेच पुराचे पाणी विहिरींमध्ये घुसल्याने पाणी प्रदूषित होते. या काळात उलटी, जुलाब, ताप, सर्दी असे विविध आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्य विभाग या काळात विशेष दक्ष असतो. यंदा आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे पावसाच्या दूषित पाण्यामुळे जिल्ह्यात कुठेही साथीचे आजार पसरले नसल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. (शहर वार्ताहर)