शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पहिला टप्पा निर्धोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2015 00:28 IST

जिल्हा परिषद : आरोग्य विभागाचा सुस्कारा

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाळा सुरु झाला असला तरी दूषित पाण्यामुळे साथींच्या आजारांचा कुठेही उद्रेक न झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यावेळी सुटकेचा श्वास घेतला आहे. तरीही पावसाळ्यात साथ उद्रेक होण्याच्या शक्यतेने जिल्ह्यातील ९१ गावांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. त्यासाठी जिल्ह्यात आरोग्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नैसर्गिक आपत्ती व पूरस्थितीमध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने पाऊस सुरु होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आखली होती. सन २०१३मध्ये पावसाळ्यात रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा, दापोली तालुक्यातील जालगाव आणि तेरेवायंगणी येथे तापाचे रुग्ण आढळून आले होते. त्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर ते डेंग्यूचे रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी या गावांमध्ये आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली होती. मात्र, सन २०१४च्या पावसाळ्यात जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळलेले नाहीत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.डेंग्यू, चिकुनगुन्या, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, तापसरीचा उद्रेक, हिवताप, काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा उद्रेक झालेल्या गावांबाबत आरोग्य विभागाने सतर्कता बाळगली आहे. या गावांवर आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पावसाळ्यासाठी संभाव्य पूरग्रस्त भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच या गावांना आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षक वेळोवेळी भेटी देऊन नियमित रोगविषयक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे पुरेसा औषधसाठा ठेवण्यात आला आहे. घरोघरी मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला पावसाच्या पाण्याबरोबर वर्षभराची घाण विहिरी, तलाव आदींमध्ये वाहून गेल्याने तेथील पाणी दूषित होते. पावसाचे पाणी तसेच पुराचे पाणी विहिरींमध्ये घुसल्याने पाणी प्रदूषित होते. या काळात उलटी, जुलाब, ताप, सर्दी असे विविध आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्य विभाग या काळात विशेष दक्ष असतो. यंदा आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे पावसाच्या दूषित पाण्यामुळे जिल्ह्यात कुठेही साथीचे आजार पसरले नसल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. (शहर वार्ताहर)