शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पहिले सत्र संपले सहामाही ‘उरकल्या’

By admin | Updated: October 17, 2014 00:39 IST

निवडणुकीमुळे गोंधळ : पालक, शिक्षक नाराज

जाकादेवी : विद्यार्थ्यांचे अर्ध्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन म्हणजे सहामाही परीक्षा काही शाळांनी अक्षरश: उरकल्याचे चित्र परिसरात आहे. जाकादेवी परिसरातील काही माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यांकन करणाऱ्या सहामाही अर्थात प्रथम सत्र परीक्षा दिवाळीपूर्वी पूर्ण करणे आवश्यक असते. किंबहुना तशा प्रकारचे जिल्हास्तरावर शिक्षण खाते आणि शाळांचे मुख्याध्यापक यांनी एकत्रित केलेले नियोजन असते. मात्र, १५ सप्टेंबरच्या दरम्यान अचानक लागलेली आचारसंहिता त्याचबरोबर जाहीर झालेला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, त्याचसोबत निवडणुकीसाठी शिक्षकांचे घेण्यात येणारे प्रशिक्षणवर्ग या सर्वांमुळे पहिल्या सत्रातील शेवटचा महिना शैक्षणिकदृष्ट्या अक्षरश: धामधुमीचा गेला. शिक्षक याद्या, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा त्यामुळे पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम कसाबसा पूर्ण झाला. पहिली ते आठवीच्या वर्गात मागे कुणाला ठेवायचे नाही, असा बालकांच्या शिक्षणाचा कायदा सांगतो. त्यामुळे पाल्यांबरोबर शिक्षकांनाही अभ्यासक्रम आणि परीक्षा याबाबत विशेष देणे-घेणे आहे, असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना निवडणुकीमुळे कामावर शिक्षकांना जावे लागले व दिवाळी सुट्टीपूर्वी पहिले सत्र पूर्ण करायचे असल्याने ही घाई करण्यात आली. त्यामुळे ज्या सहामाही परीक्षा झाल्या, त्या प्रत्येक शाळेने आपापल्या मर्जीप्रमाणेच घेतल्याचे समजते. जिल्हा नाहीतर तालुका किंवा केंद्रस्तरावरसुद्धा त्यामध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा शिक्षकवर्गात आहे. काही शाळांनी या परीक्षा ६ ते १३ आॅक्टोबर या कालावधीत घेतल्या. काही शाळांनी ६ आॅक्टोबरला परीक्षा सुरु केल्या. दि. १४ ते १६ अशी पेपरला सुटी दिली. कारण बहुतांश शिक्षक निवडणूक कामासाठी काढल्यामुळे काही शाळांनी ६ ला परीक्षा सुरु केल्या आणि त्या दि. १८ आॅक्टोबरला शेवटचा पेपर घेतील व परीक्षा संपेल. शिक्षण खात्याने हा परीक्षेचा सावळा गोंधळ भविष्यात थांबवावा, अशी पालकांची चर्चेतून मागणी पुढे येत आहे. पहिले सत्र १८ ला संपत आहे. यावेळी निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना सुट्टी सुरु होण्यापूर्वी शेवटपर्यंत शाळेत जावे लागले. (वार्ताहर)