शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

रबर कारखान्याला आग

By admin | Updated: June 10, 2014 01:26 IST

२० लाखांचे नुकसान : रत्नागिरीजवळील घटना

रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे औद्योगिक वसाहतीतील एच. पी. पॉलिमर अ‍ॅण्ड रिक्लेम इंडस्ट्रीजला आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता भीषण आग लागली. यात कंपनीतील मशिनरी व अन्य तयार साहित्य जळून खाक झाले. या आगीत कंपनीचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी नऊ वाजता लागलेली ही आग अग्निशामकांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या कंपनीत रबरावर प्रक्रिया करून रिमोल्ड टायर्स व अन्य उत्पादने बनविली जातात. सोमवार असल्याने कंपनीला साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे केवळ वॉचमन कंपनीच्या प्रवेशद्वारावर होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या शेडमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. वरच्या बाजूच्या खिडक्यांमधून आगीचे लोळही बाहेर दिसू लागताच वॉचमनने तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला याबाबतची खबर दिली. ते लगेचच घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दोन अग्निशामक बंबांनी दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आतील दोन मशीन्स जळून खाक झाल्या होत्या. बॉयलरही जळून गेला होता. शनिवारी रात्री कर्मचाऱ्यांनी रबर बनविण्यासाठी पावडर तयार करून बॉयलरच्या जवळ ठेवली होती. या पावडरनेच पेट घेतल्याने हा आगीचा भडका उडाल्याचे सांगण्यात आले. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)