शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रबर कारखान्याला आग

By admin | Updated: June 10, 2014 01:26 IST

२० लाखांचे नुकसान : रत्नागिरीजवळील घटना

रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे औद्योगिक वसाहतीतील एच. पी. पॉलिमर अ‍ॅण्ड रिक्लेम इंडस्ट्रीजला आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता भीषण आग लागली. यात कंपनीतील मशिनरी व अन्य तयार साहित्य जळून खाक झाले. या आगीत कंपनीचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी नऊ वाजता लागलेली ही आग अग्निशामकांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या कंपनीत रबरावर प्रक्रिया करून रिमोल्ड टायर्स व अन्य उत्पादने बनविली जातात. सोमवार असल्याने कंपनीला साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे केवळ वॉचमन कंपनीच्या प्रवेशद्वारावर होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या शेडमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. वरच्या बाजूच्या खिडक्यांमधून आगीचे लोळही बाहेर दिसू लागताच वॉचमनने तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला याबाबतची खबर दिली. ते लगेचच घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दोन अग्निशामक बंबांनी दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आतील दोन मशीन्स जळून खाक झाल्या होत्या. बॉयलरही जळून गेला होता. शनिवारी रात्री कर्मचाऱ्यांनी रबर बनविण्यासाठी पावडर तयार करून बॉयलरच्या जवळ ठेवली होती. या पावडरनेच पेट घेतल्याने हा आगीचा भडका उडाल्याचे सांगण्यात आले. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)