शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

पाणी बचतीसाठी नवे मार्ग शोधा

By admin | Updated: March 17, 2016 00:05 IST

एन. डी. पाटील : पाटबंधारे विभागाच्या जलजागृती सप्ताहास प्रारंभ; जलकीर्तनाने जागृती

कोल्हापूर : आपण पाणी निर्माण करू शकत नाही. भूजल साठा कधीच संपणार नाही, या भ्रमातून बाहेर पडायला हवे. पाण्याचे पुनर्भरण करता येत नाही, या मर्यादा ओळखून पाणी बचतीचे नवे मार्ग शोधून लोकांना जागे करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.पाण्याबाबत जागृती व साक्षरता निर्माण करण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फे आयोजित जलजागृती सप्ताहाचा प्रारंभ बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे प्रमुख उपस्थित होते.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, पाणी बचतीसाठी काय उपाय योजले पाहिजेत याची चर्चा करत न बसता आजपासून ठोस पावले उचलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ‘पाणी’ या विषयाकडे आपण बेजबाबदार पद्धतीने पाहत आलो आहोत. ९० टक्के शेतकरी पाणी वापराचे निर्बंध पाळत नाहीत. सरकारने ठिबक सिंचनची सक्ती करून पाणी वापराबाबत कडक भूमिका घ्यायला हवी. नागरिकांनीही भ्रमात न राहता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहावे. सध्या पाणीबाणीचा काळ असून पाण्याचा वापर कमी करता येणारी उपकरणे घरी बसवून काटकसर करावी. या पाणी संकटातून सुटका करत शेतकऱ्यांनी देशासमोर एक आदर्श ठेवायला हवा. शासनाने पाण्याचा पुर्नवापर करणारी यंत्रणा असेल तरच कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत. साखर कारखान्यांनीही मळी नदीच्या पात्रात न सोडता सहकार्य करावे. पाणी बचतीसाठी शासन पातळीवरून जागृती होत आहे. ही उमेदीची बाब आहे. जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून सिंचन शेतीचा प्रयोग राबवायला हवा. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील तलाव कोरडे पडले आहेत. लोकसहभागातून त्यातील गाळ उपशाचे काम केले गेले तर पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवता येईल. किमान पाणीसाठ्याच्या योजनांमध्ये आडकाठी न करता सहकार्य करावे.उपवन संरक्षक नाईकडे म्हणाले, जलजागृती फक्त एक दिवस न राहता ३६५ दिवस नागरिकांनी सहभागी व्हायला हवे. जलवैभव जतन करून पुढच्या पिढीकडे देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण अभ्यासक गायकवाड म्हणाले, स्वत:पासून पाणी बचत बदलास सुरुवात करायला हवी. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर पाणी बचतीचे संस्कार देण्याची गरज आहे. पाण्याचा एकही थेंब वाया घालवणार नाही, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. जलकीर्तनकार विश्वनाथ डवरी यांचे कीर्तन झाले. सिद्धार्थ बद्दी यांनी लोकगीत सादर केले. कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधीक्षक अभियंता एम. एस. जिवणे, एस. सी. कोष्टी, कार्यकारी अभियंता शि. मा. चव्हाण, वि. पा. पाटील, जे. जे. बारदेसकर, अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)जलदिंडीत सोळा नद्यांचे पाणीसकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरातील भजन, हलगीच्या कडकडाटात सिंचन भवन-जिल्हाधिकारी कार्यालय- असेंब्ली रोड- व्हीनस कॉर्नर- दसरा चौक या मार्गावरून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महिला अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील १६ नद्यांच्या पाण्याचे कलश डोक्यावर घेऊन या जलदिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या.