शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी नवे मार्ग शोधा

By admin | Updated: March 17, 2016 00:05 IST

एन. डी. पाटील : पाटबंधारे विभागाच्या जलजागृती सप्ताहास प्रारंभ; जलकीर्तनाने जागृती

कोल्हापूर : आपण पाणी निर्माण करू शकत नाही. भूजल साठा कधीच संपणार नाही, या भ्रमातून बाहेर पडायला हवे. पाण्याचे पुनर्भरण करता येत नाही, या मर्यादा ओळखून पाणी बचतीचे नवे मार्ग शोधून लोकांना जागे करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.पाण्याबाबत जागृती व साक्षरता निर्माण करण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फे आयोजित जलजागृती सप्ताहाचा प्रारंभ बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे प्रमुख उपस्थित होते.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, पाणी बचतीसाठी काय उपाय योजले पाहिजेत याची चर्चा करत न बसता आजपासून ठोस पावले उचलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ‘पाणी’ या विषयाकडे आपण बेजबाबदार पद्धतीने पाहत आलो आहोत. ९० टक्के शेतकरी पाणी वापराचे निर्बंध पाळत नाहीत. सरकारने ठिबक सिंचनची सक्ती करून पाणी वापराबाबत कडक भूमिका घ्यायला हवी. नागरिकांनीही भ्रमात न राहता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहावे. सध्या पाणीबाणीचा काळ असून पाण्याचा वापर कमी करता येणारी उपकरणे घरी बसवून काटकसर करावी. या पाणी संकटातून सुटका करत शेतकऱ्यांनी देशासमोर एक आदर्श ठेवायला हवा. शासनाने पाण्याचा पुर्नवापर करणारी यंत्रणा असेल तरच कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत. साखर कारखान्यांनीही मळी नदीच्या पात्रात न सोडता सहकार्य करावे. पाणी बचतीसाठी शासन पातळीवरून जागृती होत आहे. ही उमेदीची बाब आहे. जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून सिंचन शेतीचा प्रयोग राबवायला हवा. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील तलाव कोरडे पडले आहेत. लोकसहभागातून त्यातील गाळ उपशाचे काम केले गेले तर पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवता येईल. किमान पाणीसाठ्याच्या योजनांमध्ये आडकाठी न करता सहकार्य करावे.उपवन संरक्षक नाईकडे म्हणाले, जलजागृती फक्त एक दिवस न राहता ३६५ दिवस नागरिकांनी सहभागी व्हायला हवे. जलवैभव जतन करून पुढच्या पिढीकडे देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण अभ्यासक गायकवाड म्हणाले, स्वत:पासून पाणी बचत बदलास सुरुवात करायला हवी. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर पाणी बचतीचे संस्कार देण्याची गरज आहे. पाण्याचा एकही थेंब वाया घालवणार नाही, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. जलकीर्तनकार विश्वनाथ डवरी यांचे कीर्तन झाले. सिद्धार्थ बद्दी यांनी लोकगीत सादर केले. कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधीक्षक अभियंता एम. एस. जिवणे, एस. सी. कोष्टी, कार्यकारी अभियंता शि. मा. चव्हाण, वि. पा. पाटील, जे. जे. बारदेसकर, अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)जलदिंडीत सोळा नद्यांचे पाणीसकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरातील भजन, हलगीच्या कडकडाटात सिंचन भवन-जिल्हाधिकारी कार्यालय- असेंब्ली रोड- व्हीनस कॉर्नर- दसरा चौक या मार्गावरून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महिला अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील १६ नद्यांच्या पाण्याचे कलश डोक्यावर घेऊन या जलदिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या.