शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

पाणी बचतीसाठी नवे मार्ग शोधा

By admin | Updated: March 17, 2016 00:05 IST

एन. डी. पाटील : पाटबंधारे विभागाच्या जलजागृती सप्ताहास प्रारंभ; जलकीर्तनाने जागृती

कोल्हापूर : आपण पाणी निर्माण करू शकत नाही. भूजल साठा कधीच संपणार नाही, या भ्रमातून बाहेर पडायला हवे. पाण्याचे पुनर्भरण करता येत नाही, या मर्यादा ओळखून पाणी बचतीचे नवे मार्ग शोधून लोकांना जागे करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.पाण्याबाबत जागृती व साक्षरता निर्माण करण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फे आयोजित जलजागृती सप्ताहाचा प्रारंभ बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे प्रमुख उपस्थित होते.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, पाणी बचतीसाठी काय उपाय योजले पाहिजेत याची चर्चा करत न बसता आजपासून ठोस पावले उचलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ‘पाणी’ या विषयाकडे आपण बेजबाबदार पद्धतीने पाहत आलो आहोत. ९० टक्के शेतकरी पाणी वापराचे निर्बंध पाळत नाहीत. सरकारने ठिबक सिंचनची सक्ती करून पाणी वापराबाबत कडक भूमिका घ्यायला हवी. नागरिकांनीही भ्रमात न राहता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहावे. सध्या पाणीबाणीचा काळ असून पाण्याचा वापर कमी करता येणारी उपकरणे घरी बसवून काटकसर करावी. या पाणी संकटातून सुटका करत शेतकऱ्यांनी देशासमोर एक आदर्श ठेवायला हवा. शासनाने पाण्याचा पुर्नवापर करणारी यंत्रणा असेल तरच कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत. साखर कारखान्यांनीही मळी नदीच्या पात्रात न सोडता सहकार्य करावे. पाणी बचतीसाठी शासन पातळीवरून जागृती होत आहे. ही उमेदीची बाब आहे. जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून सिंचन शेतीचा प्रयोग राबवायला हवा. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील तलाव कोरडे पडले आहेत. लोकसहभागातून त्यातील गाळ उपशाचे काम केले गेले तर पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवता येईल. किमान पाणीसाठ्याच्या योजनांमध्ये आडकाठी न करता सहकार्य करावे.उपवन संरक्षक नाईकडे म्हणाले, जलजागृती फक्त एक दिवस न राहता ३६५ दिवस नागरिकांनी सहभागी व्हायला हवे. जलवैभव जतन करून पुढच्या पिढीकडे देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण अभ्यासक गायकवाड म्हणाले, स्वत:पासून पाणी बचत बदलास सुरुवात करायला हवी. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर पाणी बचतीचे संस्कार देण्याची गरज आहे. पाण्याचा एकही थेंब वाया घालवणार नाही, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. जलकीर्तनकार विश्वनाथ डवरी यांचे कीर्तन झाले. सिद्धार्थ बद्दी यांनी लोकगीत सादर केले. कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधीक्षक अभियंता एम. एस. जिवणे, एस. सी. कोष्टी, कार्यकारी अभियंता शि. मा. चव्हाण, वि. पा. पाटील, जे. जे. बारदेसकर, अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)जलदिंडीत सोळा नद्यांचे पाणीसकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरातील भजन, हलगीच्या कडकडाटात सिंचन भवन-जिल्हाधिकारी कार्यालय- असेंब्ली रोड- व्हीनस कॉर्नर- दसरा चौक या मार्गावरून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महिला अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील १६ नद्यांच्या पाण्याचे कलश डोक्यावर घेऊन या जलदिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या.