शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

पाणी बचतीसाठी नवे मार्ग शोधा

By admin | Updated: March 17, 2016 00:05 IST

एन. डी. पाटील : पाटबंधारे विभागाच्या जलजागृती सप्ताहास प्रारंभ; जलकीर्तनाने जागृती

कोल्हापूर : आपण पाणी निर्माण करू शकत नाही. भूजल साठा कधीच संपणार नाही, या भ्रमातून बाहेर पडायला हवे. पाण्याचे पुनर्भरण करता येत नाही, या मर्यादा ओळखून पाणी बचतीचे नवे मार्ग शोधून लोकांना जागे करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.पाण्याबाबत जागृती व साक्षरता निर्माण करण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फे आयोजित जलजागृती सप्ताहाचा प्रारंभ बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे प्रमुख उपस्थित होते.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, पाणी बचतीसाठी काय उपाय योजले पाहिजेत याची चर्चा करत न बसता आजपासून ठोस पावले उचलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ‘पाणी’ या विषयाकडे आपण बेजबाबदार पद्धतीने पाहत आलो आहोत. ९० टक्के शेतकरी पाणी वापराचे निर्बंध पाळत नाहीत. सरकारने ठिबक सिंचनची सक्ती करून पाणी वापराबाबत कडक भूमिका घ्यायला हवी. नागरिकांनीही भ्रमात न राहता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहावे. सध्या पाणीबाणीचा काळ असून पाण्याचा वापर कमी करता येणारी उपकरणे घरी बसवून काटकसर करावी. या पाणी संकटातून सुटका करत शेतकऱ्यांनी देशासमोर एक आदर्श ठेवायला हवा. शासनाने पाण्याचा पुर्नवापर करणारी यंत्रणा असेल तरच कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत. साखर कारखान्यांनीही मळी नदीच्या पात्रात न सोडता सहकार्य करावे. पाणी बचतीसाठी शासन पातळीवरून जागृती होत आहे. ही उमेदीची बाब आहे. जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून सिंचन शेतीचा प्रयोग राबवायला हवा. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील तलाव कोरडे पडले आहेत. लोकसहभागातून त्यातील गाळ उपशाचे काम केले गेले तर पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवता येईल. किमान पाणीसाठ्याच्या योजनांमध्ये आडकाठी न करता सहकार्य करावे.उपवन संरक्षक नाईकडे म्हणाले, जलजागृती फक्त एक दिवस न राहता ३६५ दिवस नागरिकांनी सहभागी व्हायला हवे. जलवैभव जतन करून पुढच्या पिढीकडे देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण अभ्यासक गायकवाड म्हणाले, स्वत:पासून पाणी बचत बदलास सुरुवात करायला हवी. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर पाणी बचतीचे संस्कार देण्याची गरज आहे. पाण्याचा एकही थेंब वाया घालवणार नाही, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. जलकीर्तनकार विश्वनाथ डवरी यांचे कीर्तन झाले. सिद्धार्थ बद्दी यांनी लोकगीत सादर केले. कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधीक्षक अभियंता एम. एस. जिवणे, एस. सी. कोष्टी, कार्यकारी अभियंता शि. मा. चव्हाण, वि. पा. पाटील, जे. जे. बारदेसकर, अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)जलदिंडीत सोळा नद्यांचे पाणीसकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरातील भजन, हलगीच्या कडकडाटात सिंचन भवन-जिल्हाधिकारी कार्यालय- असेंब्ली रोड- व्हीनस कॉर्नर- दसरा चौक या मार्गावरून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महिला अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील १६ नद्यांच्या पाण्याचे कलश डोक्यावर घेऊन या जलदिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या.